शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

भाजपाचा परतीचा प्रवास सुरू, नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 18:13 IST

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे

मुंबई - केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजीव  गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले होते. तसेच शिवसेनाही मैदानात होती. मात्र या सर्वांवर मात करत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला. 81 सदस्य असलेल्या महानगर पालिकेत काँग्रेसचे 70 हून अधिक सदस्य निवडून आले. या यशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, "नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेडकरांनी भाजपाच्या खोट्या प्रचाराला धुडकावले. जनतेने काँग्रेसच्या कामांवर विश्वास दर्शवला. आज मिळवलेल्या विजयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाटाही मोठा आहे."यावेळी भाजपाने निवडणुकीपूर्वी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचाही समाचार घेतला. "नांदेडमध्ये भाजपाने फोडाफोडीचे राजकारण केले. भाजपावाल्यांनी काँग्रेसचे सहा नगरसेवक फोडले. मात्र आज लागलेल्या निकालांमध्ये हे सर्व नगरसेवक पराभूत झाले आहेत. भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी नाकारले आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. नांदेड आणि त्याआधी परभणी, मालेगाव, भिवंडी आदी महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालांमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली झाली." यावेळी पेट्रोलची दरवाढ, महागाई, जीएसटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यांवरूनही अशोक चव्हाण यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. नांदेड महानगपालिकेच्या निवडणुकीनंतर अभिनंदन करणाऱ्या नारायण राणेंचे अशोक चव्हाण यांनी आभार मानले. मात्र राणेंनी भाजपा नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचा धागा पकडत चव्हाण यांनी याचा विचार भाजपा नेत्यांनी केला पाहिजे, असा चिमटा काढला. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एनडीएचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेसह भाजपावर प्रहार केला होता. उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला होता. त्याआधी काँग्रेसने निकालांमध्ये आघाडी घेतल्यावर नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली होती. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांचे आभार मानले. तसेच भाजपावर सडेतोड टीकाही केली. नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा