शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही"; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, "औरंगजेबाचा जप ज्यांच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:56 IST

गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जात नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

Ashish Shelar on Uddhav Thackeray: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. काही लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास घाबरतात, असं एकनाथ शिदेंनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना गंगेत स्नान केल्याने कोणतेही पाप धुतले जात नाही म्हणत उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदेंनी पलटवार केला. यावरुनच आता मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह महाकुंभात स्नान केले. मात्र उद्धव ठाकरे हे महाकुंभात गेले नाहीत. यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावरुन उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राशी गद्दारी करून केलेले पाप अनेकवेळा गंगेत स्नान करूनही धुतले जाणार नाही. मी गंगेचा आदर करतो, पण त्यात डुबकी मारून काय उपयोग? गंगेत उडी मारून देशद्रोही हे लेबल हटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेवर मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत पलटवार केला.

"अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील "छावा" सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला...! "छावा" वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा "सामना" सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत.. स्वागत करीत आहेत.कुंभमेळा भरला.. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्यापुर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी... ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?", अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजपवर टीका

"भाजपने प्रभू रामाचे महत्व सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे योगदान नव्हते त्यांच्या हातात सत्तेचा लगाम आहे, तर महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचे योगदान नव्हते ते इथे सत्तेत आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे