शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कृत्रिम पाऊस बरसणार नाही

By admin | Updated: June 15, 2016 03:36 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़२००९ मध्ये मुंबईला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागला होता़ पारंपरिक पद्धतीने जमा होणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे समोर आले़ त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता़ जमीन व हवेतून वरुणराजाला तलाव क्षेत्रांकडे आणण्याचे प्रयोग झाले़ मात्र, करोडो रुपये उडवूनही ‘खोटा’ पाऊस पडल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही़ अखेर पालिकेने भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि हवामान तज्ज्ञ जे़आऱ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी पाणलोट क्षेत्रातील १५ वर्षांच्या पावसाच्या परिमाणाचे विश्लेषण करून ढगांच्या बीजीकरणाद्वारे पाऊस पाडण्याची गरज नाही, अशी शिफारस केली आहे़ हा प्रयोगही खर्चीक असल्याने पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी )1972 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला प्रयोग झाला होता़ मात्र, तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते़ 2009मध्ये रसायनांचा धूर व विमानातून रसायनांची फवारणी करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता़मात्र, या प्रयोगामुळे तलाव क्षेत्रात किती पाऊस झाला, याची मोजदाद करण्यासाठी कोणतेच यंत्र नाही़ त्यामुळे या प्रयोगाच्या यशाबाबत साशंकताच आहे़2013मध्ये शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात ढगांचे बीजीकरण करून खोटा पाऊस पाडण्यात येणार होता़ यासाठी आयआयटीएमला पाचारण करण्यात आले होते़