शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:08 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली.

Amit Shah on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्यावरुन वाद सुरू झाला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 परत आणणार असल्याचे सातत्याने सांगत आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड वादावादी झाली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शाह म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत करण्याची भाषा करतात. पण इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही,' अशी स्पष्टोक्ती शाहांनी दिली.

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेलमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर होता, मात्र मोदींनी देशाला पाचव्या स्थानावर आणले. 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आघाडीचे लोक (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात. महायुती म्हणजे 'विकास' आणि आघाडी म्हणजे 'विनाश'. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की, उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचे आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर