शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:32 IST

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमच्या सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, शेतकरी त्रस्त होते अशावेळी त्यांच्याकडून वीज बिलांची जुलमी वसुली करायला हवी होती काय, असा सवाल करीत भाजपने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर गुरुवारी पलटवार केला.

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

पाठक म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा २१ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आज ती ४७ हजार कोटी रुपये आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी बिले न भरल्याने आलेल्या ५ हजार कोटींच्या थकबाकीचाही त्यात समावेश आहे. तसेच थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या १८ टक्के दंड व्याजाचाही त्यात समावेश आहे. आमच्या काळात दुष्काळ होता, कृषी पंपांवरील विजेचा वापर वाढला होता. आधी २१ दशलक्ष युनिट असलेला वापर ३२ लाख दशलक्ष युनिटवर गेला होता. त्यातच आमच्या सरकारने सहा लाख नवीन कृषी पंप वीज जोडण्या दिल्या, त्यानेही वीजवापर वाढला. आधीच्या सरकारमध्ये वीज बिल वसुली १०० रुपयांमागे २१ रुपये इतकी होती, ती ६५ रुपयांवर गेली.

एका ट्रान्सफॉर्मरवर २५ कृषी पंपांचे कनेक्शन असेल आणि त्यातील एका कनेक्शनची थकबाकी झाली तरी सर्व कनेक्शन कापावेत असे तुघलकी परिपत्रक आघाडी सरकारने काढलेले होते, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. आमचे सरकार येताच ते परिपत्रक रद्द करण्यात आले. आमच्या काळात महावितरण नफ्यात होते, त्याचा ताळेबंद सर्वांच्यासमोर आहे. राऊत यांनी उगाच दिशाभूल करू नये.  

 - विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Rautनितीन राऊत