शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:32 IST

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमच्या सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, शेतकरी त्रस्त होते अशावेळी त्यांच्याकडून वीज बिलांची जुलमी वसुली करायला हवी होती काय, असा सवाल करीत भाजपने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर गुरुवारी पलटवार केला.

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

पाठक म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा २१ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आज ती ४७ हजार कोटी रुपये आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी बिले न भरल्याने आलेल्या ५ हजार कोटींच्या थकबाकीचाही त्यात समावेश आहे. तसेच थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या १८ टक्के दंड व्याजाचाही त्यात समावेश आहे. आमच्या काळात दुष्काळ होता, कृषी पंपांवरील विजेचा वापर वाढला होता. आधी २१ दशलक्ष युनिट असलेला वापर ३२ लाख दशलक्ष युनिटवर गेला होता. त्यातच आमच्या सरकारने सहा लाख नवीन कृषी पंप वीज जोडण्या दिल्या, त्यानेही वीजवापर वाढला. आधीच्या सरकारमध्ये वीज बिल वसुली १०० रुपयांमागे २१ रुपये इतकी होती, ती ६५ रुपयांवर गेली.

एका ट्रान्सफॉर्मरवर २५ कृषी पंपांचे कनेक्शन असेल आणि त्यातील एका कनेक्शनची थकबाकी झाली तरी सर्व कनेक्शन कापावेत असे तुघलकी परिपत्रक आघाडी सरकारने काढलेले होते, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. आमचे सरकार येताच ते परिपत्रक रद्द करण्यात आले. आमच्या काळात महावितरण नफ्यात होते, त्याचा ताळेबंद सर्वांच्यासमोर आहे. राऊत यांनी उगाच दिशाभूल करू नये.  

 - विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Rautनितीन राऊत