शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:32 IST

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमच्या सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, शेतकरी त्रस्त होते अशावेळी त्यांच्याकडून वीज बिलांची जुलमी वसुली करायला हवी होती काय, असा सवाल करीत भाजपने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर गुरुवारी पलटवार केला.

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

पाठक म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा २१ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आज ती ४७ हजार कोटी रुपये आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी बिले न भरल्याने आलेल्या ५ हजार कोटींच्या थकबाकीचाही त्यात समावेश आहे. तसेच थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या १८ टक्के दंड व्याजाचाही त्यात समावेश आहे. आमच्या काळात दुष्काळ होता, कृषी पंपांवरील विजेचा वापर वाढला होता. आधी २१ दशलक्ष युनिट असलेला वापर ३२ लाख दशलक्ष युनिटवर गेला होता. त्यातच आमच्या सरकारने सहा लाख नवीन कृषी पंप वीज जोडण्या दिल्या, त्यानेही वीजवापर वाढला. आधीच्या सरकारमध्ये वीज बिल वसुली १०० रुपयांमागे २१ रुपये इतकी होती, ती ६५ रुपयांवर गेली.

एका ट्रान्सफॉर्मरवर २५ कृषी पंपांचे कनेक्शन असेल आणि त्यातील एका कनेक्शनची थकबाकी झाली तरी सर्व कनेक्शन कापावेत असे तुघलकी परिपत्रक आघाडी सरकारने काढलेले होते, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. आमचे सरकार येताच ते परिपत्रक रद्द करण्यात आले. आमच्या काळात महावितरण नफ्यात होते, त्याचा ताळेबंद सर्वांच्यासमोर आहे. राऊत यांनी उगाच दिशाभूल करू नये.  

 - विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Rautनितीन राऊत