शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अर्णब गोस्वामी म्हणाले, आपल्या जीवाला धोका; फिल्ममेकरनं लिहिलं - मुंबईत एकच राजा...!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 10, 2020 17:27 IST

गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली.अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

मुंबई - गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अर्णब यांना नुकतेच तळोजा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे गाडीतूनच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना  सांगितले.

अर्णब यांच्या या वक्तव्यावर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. ते अनेक वेळा आपली मते ट्विटरवरून मांडत असतात. त्यांनी लिहिले आहे 'मुंबईचा राजा कोण? ते आहेत मुंबई पोलीस... आणि हेच एक सत्य आहे.' त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राम गोपाल वर्मांच्या ट्विटला विरोध केला, तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहे.

'ऑपरेशन अर्णब'साठी करण्यात आली होती मोठी तयारी, गृह विभागानं तयार केली 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम

आनंद नावाच्या एका यूझरने रिअॅक्ट होतांना लिहिले आहे, 'मला माहीत आहे.. पालघर लिंचिंगदरम्यान मी डरपोक पोलिसांना पाहिले आहेत.' 

सिद्धार्थ नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'म्हणून तू गोव्याला पळून गेलास का?' 

‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

सुनील अत्री नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'भिकू म्हात्रेला थोड्या वेळासाठी भ्रम झाला होता.' तर सोनाजी पोहारे यांनी राम गोपाल वर्मा यांचे समर्थन करताना लिहिले आहे, 'फक्त मुंबई पोलीस १०० टक्के बरोबर आहेत.'

यापूर्वीही केली होती एक पोस्ट -बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यात, शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणाऱ्या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशा आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस ​​​​​​​

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसRam Gopal Varmaराम गोपाल वर्माbollywoodबॉलिवूडJournalistपत्रकार