शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

अर्णब गोस्वामी म्हणाले, आपल्या जीवाला धोका; फिल्ममेकरनं लिहिलं - मुंबईत एकच राजा...!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 10, 2020 17:27 IST

गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली.अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

मुंबई - गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अर्णब यांना नुकतेच तळोजा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे गाडीतूनच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना  सांगितले.

अर्णब यांच्या या वक्तव्यावर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. ते अनेक वेळा आपली मते ट्विटरवरून मांडत असतात. त्यांनी लिहिले आहे 'मुंबईचा राजा कोण? ते आहेत मुंबई पोलीस... आणि हेच एक सत्य आहे.' त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राम गोपाल वर्मांच्या ट्विटला विरोध केला, तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहे.

'ऑपरेशन अर्णब'साठी करण्यात आली होती मोठी तयारी, गृह विभागानं तयार केली 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम

आनंद नावाच्या एका यूझरने रिअॅक्ट होतांना लिहिले आहे, 'मला माहीत आहे.. पालघर लिंचिंगदरम्यान मी डरपोक पोलिसांना पाहिले आहेत.' 

सिद्धार्थ नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'म्हणून तू गोव्याला पळून गेलास का?' 

‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

सुनील अत्री नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'भिकू म्हात्रेला थोड्या वेळासाठी भ्रम झाला होता.' तर सोनाजी पोहारे यांनी राम गोपाल वर्मा यांचे समर्थन करताना लिहिले आहे, 'फक्त मुंबई पोलीस १०० टक्के बरोबर आहेत.'

यापूर्वीही केली होती एक पोस्ट -बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यात, शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणाऱ्या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशा आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस ​​​​​​​

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसRam Gopal Varmaराम गोपाल वर्माbollywoodबॉलिवूडJournalistपत्रकार