शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:53 AM

ऐनवेळी आता अंबादास दानवे यांचे नाव पुढे आल्याने खोतकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मुंबई - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य हेच स्पर्धेत असल्याचे म्हटले जात होते. मात्र ऐनवेळी आतापर्यंत स्पर्धेत नसलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे शेवटच्या टप्प्यात आघाडीवर आले आहेत. तर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांसह दोन्ही जिल्ह्यांतील २० जणांशी चर्चा केली. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र अंबादास दानवे यांचे नाव निश्चित समजले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर खोतकर यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमदेवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर यावेळी शिवसेनेकडून त्यांचे नाव निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी आता अंबादास दानवे यांचे नाव पुढे आल्याने खोतकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. आज अधिकृत उमेदवाराची घोषणा होऊ शकते. मात्र अंबादास दानेवेंच्या नावाच्या चर्चेमुळे खोतकरांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

आंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तर, खोतकर यांना विधानसभा वेतिरिक्त पर्याय उरणार नाही. तर लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नाही म्हणून रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खोतकरांची पुन्हा नाराजी वाढू शकते. त्यामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या युतीच्या उमेदवारीनंतर जालना जिल्ह्यातील राजकरण पुन्हा तापण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.