शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

"अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:50 IST

NCP Ajit Pawar Criticize Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता

मुंबई  - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच यापुढे राज्याच्या राजकारणात एकतर तुम्ही तरी राहाल, नाहीतर मी तरी राहीन अशा निर्वाणीच्या भाषेत आव्हान दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार टीका केली आहे. ‘’अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते’ असा टोला अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना दगा दिला आणि युती तोडून महाविकास आघाडीत गेले. राजकारणात ऐनवेळी फसवल्यानंतर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळेच तुम्हाला मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, आपला पक्ष फुटला त्याचा राग व्यक्तिगत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढताय हे योग्य नाही असेही उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

उमेश पाटील पुढे म्हणाले की, लोकांसाठी वेळ देतो, परिश्रम घेतो, तोच राजकारणात टिकतो. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या गराड्यात असतात. तुम्ही मात्र घरात बसता. तुमच्या आमदारांना भेटण्यासाठी वेळ मागावी लागते. तुम्ही आमदार खासदारांना सहा सहा महिने भेटत नाही, असा टोला  उमेश पाटील यांनी यावेळी लगावला.  

शिवसेना का फुटली, त्याची कारणे काय आहेत. तुम्ही कोरोना काळात घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होतात. आमदारांना भेटायचे असते. आमदार हे तीन तीन लाख लोकांमधून निवडून येतात. बैठका घ्याव्या लागतात. त्यांना वेळ द्यावा लागतो. मात्र वेळ दिला नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणापासून तुम्ही दूर फेकले गेलात. राजकारणात टिकून राहण्यासाठी सातत्याने लोकांची कामे करावी लागतात. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असेही उमेश पाटील म्हणाले.

तुमची भूमिका महाराष्ट्राच्या भल्यासाठी असली पाहिजे. शिवसेना संघटना एकट्या  देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात व्यक्तिकेंद्रीत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे तुमच्याबद्दल विचार करावा लागेल, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस