शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:47 IST

मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी पक्षीय राजकारणावर भाष्य केले होते. तिथेच बाळासाहेब थोरात यांनीही पक्षांतर्गत वादातून तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असं म्हटलं होते. त्यामुळे काँग्रेसमधील पटोले-थोरात वाद समोर आला होता. त्यातच या वादाचा फायदा घेत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्याला अशोक चव्हाणांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण संबंध आहेत म्हणून त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी माझे समान मत असेल असं मानायचं कारण नाही. विखे पाटलांच्या सदिच्छेबद्दल आभार परंतु मी कुठलाही विचार किंवा निर्णय घेतला नाही. याआधीही मी अनेकदा यावर भाष्य केले आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत ते माझे मित्र आहेत की शत्रू आहेत हाच खरा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस पक्षात काही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का याची शंका येते. मी त्यांना शुभेच्छा देतो मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला सल्ला मला अमान्य आहे असं स्पष्ट शब्दात सांगत अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याची ऑफर नाकारली आहे. 

काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं काँग्रेस पक्षात काहीच भवितव्य नाही. त्यांचे भवितव्य अंधारमय आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करावा. लवकरच काँग्रेसचा कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसमध्ये भविष्य नाही. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वात काम करायला हवं असं विधान करत राधाकृष्ण विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना थेट भाजपात येण्याची ऑफर दिली होती.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील