शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:47 IST

मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी पक्षीय राजकारणावर भाष्य केले होते. तिथेच बाळासाहेब थोरात यांनीही पक्षांतर्गत वादातून तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असं म्हटलं होते. त्यामुळे काँग्रेसमधील पटोले-थोरात वाद समोर आला होता. त्यातच या वादाचा फायदा घेत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्याला अशोक चव्हाणांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण संबंध आहेत म्हणून त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी माझे समान मत असेल असं मानायचं कारण नाही. विखे पाटलांच्या सदिच्छेबद्दल आभार परंतु मी कुठलाही विचार किंवा निर्णय घेतला नाही. याआधीही मी अनेकदा यावर भाष्य केले आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत ते माझे मित्र आहेत की शत्रू आहेत हाच खरा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस पक्षात काही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का याची शंका येते. मी त्यांना शुभेच्छा देतो मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला सल्ला मला अमान्य आहे असं स्पष्ट शब्दात सांगत अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याची ऑफर नाकारली आहे. 

काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं काँग्रेस पक्षात काहीच भवितव्य नाही. त्यांचे भवितव्य अंधारमय आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करावा. लवकरच काँग्रेसचा कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसमध्ये भविष्य नाही. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वात काम करायला हवं असं विधान करत राधाकृष्ण विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना थेट भाजपात येण्याची ऑफर दिली होती.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील