शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

महामंडळ, एस.ई.ओ. पदाच्या नियुक्त्या जाहीर करा, मुंबई काँग्रेसच्या माजी सचिवाचं नाना पटोलेंना निवेदन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:57 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही...

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन 13 महिन्यांहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. मात्र, अद्याप साध्या एस. ई. ओ व महामंडळ नियुक्त्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे  एस.ई. ओ. आणि महामंडळ नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी सचिव धनंजय जुन्नरकर (Dhananjay junnarkar) यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवेदन दिले आहे. (Announce the Corporation, S.E.O. appointments, statement of former Mumbai Congress secretary to Nana Patole)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन व पद रिक्त राहून एक वर्ष व्हायला आले आहे.

महाराष्ट्रात तीन पक्षाची सत्ता असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचे आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना गेल्या सहा-सात वर्षांत कोणतीही शासकीय पदे मिळालेले नाही. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात सर्वांनाच पक्ष तिकीट देऊ शकत नाही, अशा वेळी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाकडे 40 महामंडळे असून यात 350 ते 400 वरिष्ठ पदाधिकारी आणि एस.ई.ओ.च्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात काम करू लागतील व कार्यकर्त्यांनादेखील न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी ज्यांची नावे गेली आहेत त्या नावांना महामंडळात सामील करून घेतल्यास त्यांच्यावरदेखील अन्याय होणार नाही ,असेही  जुन्नरकर म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस