शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महामंडळ, एस.ई.ओ. पदाच्या नियुक्त्या जाहीर करा, मुंबई काँग्रेसच्या माजी सचिवाचं नाना पटोलेंना निवेदन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:57 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही...

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन 13 महिन्यांहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. मात्र, अद्याप साध्या एस. ई. ओ व महामंडळ नियुक्त्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे  एस.ई. ओ. आणि महामंडळ नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी सचिव धनंजय जुन्नरकर (Dhananjay junnarkar) यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवेदन दिले आहे. (Announce the Corporation, S.E.O. appointments, statement of former Mumbai Congress secretary to Nana Patole)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन व पद रिक्त राहून एक वर्ष व्हायला आले आहे.

महाराष्ट्रात तीन पक्षाची सत्ता असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचे आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना गेल्या सहा-सात वर्षांत कोणतीही शासकीय पदे मिळालेले नाही. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात सर्वांनाच पक्ष तिकीट देऊ शकत नाही, अशा वेळी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाकडे 40 महामंडळे असून यात 350 ते 400 वरिष्ठ पदाधिकारी आणि एस.ई.ओ.च्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात काम करू लागतील व कार्यकर्त्यांनादेखील न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी ज्यांची नावे गेली आहेत त्या नावांना महामंडळात सामील करून घेतल्यास त्यांच्यावरदेखील अन्याय होणार नाही ,असेही  जुन्नरकर म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस