शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“कोण आहेत पार्थ पवार? राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये”: अंजली दमानिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 21:18 IST

Anjali Damania News: महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा मान हा गुणवत्तेला मिळायला हवा, वारसाहक्काला नव्हे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Anjali Damania News:अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या. उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सक्रीय होत अनेक बैठका घेतल्या. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेल्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी स्वीकारली. यानंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत यावर भाष्य केले. 

अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची सूत्रे आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचेही चर्चा सुरू झाली. पण, ही चर्चा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावली. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा देण्याचा विषयही त्याठिकाणी झाला नाही. कुठल्याही व्यक्तीला राज्याचा किंवा देशाचा मंत्री होत असताना सहा महिने त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा वेळ असतो. अशा वेळी इतर सभागृहाचे सदस्यत्व त्याच्याकडे असेल, तर ते कायद्याने ठेवता येते, असे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर वर्णी लागण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

कोण आहेत पार्थ पवार? राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये

कोण आहेत पार्थ पवार? महाराष्ट्रासाठी त्यांचे ठोस सामाजिक किंवा राजकीय योगदान नेमके काय आहे? जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी कोणती सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे? कोणते आंदोलन, कोणती धोरणात्मक पुढाकार, कोणते लोकहिताचे काम त्यांच्या नावावर आहे? राज्यसभेसारख्या गंभीर आणि प्रतिष्ठित सभागृहात पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये. पात्रता, अनुभव, जनाधार आणि कार्याचा ठसा, यावरच निर्णय व्हायला हवा. महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा मान हा गुणवत्तेला मिळायला हवा, वारसाहक्काला नव्हे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या साथीने अजितदादांची जोरदार सुरुवात झाली होती. यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतील बारावा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि अचानक अजितदादा आपल्याला सोडून गेले. पण यापूर्वीच अजितदादांच्या टीमने अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात नेली होती. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस सादर करतील. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका करण्यात येत होती; पण पुन्हा सत्तेत आल्यावर अजित पवारांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली. हे माझं पहिलंच अधिवेशन आहे आणि मला खात्री आहे की हे अधिवेशन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anjali Damania questions Parth Pawar's Rajya Sabha nomination based on lineage.

Web Summary : Anjali Damania questions Parth Pawar's suitability for Rajya Sabha. She emphasizes merit, experience, and public service over family name for such a prestigious position.
टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद