शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांशी काय चर्चा झाली? कोणते आश्वासन मिळाले? अंजली दमानिया यांनी सगळी माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:07 IST

Anjali Damania Met DCM Ajit Pawar: उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

Anjali Damania Met DCM Ajit Pawar: सुमारे २५ ते ३० मिनिटे चर्चा झाली. बीडची घटना माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यावर माझे म्हणणे होते की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही. या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज मी त्यांना दाखवले आहे की, कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांत आर्थिक नफा कसा मिळत आहे. तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे सांगितले. गृह मंत्रालयाने आमदार, मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले आहेत, तेही दाखवले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय आश्वासन दिले, याबाबत अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक

लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. तसेच त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे सोकॉल्ड समर्थक, ते समर्थक नाहीत तर दहशतवादी आहेत. बीडमध्ये त्यांची दहशत आहे. यासंदर्भातील सगळे फोटो, रिल्स दाखवले. हे सगळे अजित पवार यांनी शांतपणे पाहिले आणि त्यांनी असे सांगितले आहे की, उद्या दुपारी १२ वाजता त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आहे. त्या बैठकीत ही सगळी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय ते घेणार आहेत. मला खात्री आहे की, जनभावना आहे, आक्रोश आहे, जे कृत्य झाले ते फारच निर्घृण होते. त्यामुळेच आपण हा लढा देत आहोत. हे मी त्यांना सांगितले. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेले कृत्य यापुढे कधीही होऊ नये, असे महाराष्ट्रात घडू नये. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे तातडीने आवश्यक आहे, असे मी त्यांना सांगितले, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का? असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर मी समोर ठेवलेली माहिती त्यांनी ज्या पद्धतीने पाहिली, त्यावरून त्यांना अनेक गोष्टींची माहिती नसावी. हे सगळे मिळून काय करत आहेत. सुदर्शन घुले असो, विष्णू चाटे असो, या सगळ्यांची कशी मिलीभगत आहे आणि ते लोकांवर कसा दबाव आणत आहेत. सामान्य माणसाला जगणे कसे कठीण आहे, हे सगळे दाखवले. यापुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको. म्हणूनच मी त्यांना विनंती केली की, त्यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ दे. सगळे काय ते बाहेर निघेल, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

...तर धनंजय मुंडे यांचे केवळ मंत्रिपद नाही, तर आमदारकी रद्द होऊ शकते

अजित पवार यांचे म्हणणे होते की, तपासात काही आढळले तर आम्ही पुढे काय करायचे ते पाहू. अजित पवारांची ही भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर, मी आज त्यांना जे पेपर दाखवले आहेत, त्यानंतर कोणती शंका राहणे शक्यच नाही. पुराव्यानिशी गोष्टी दाखवल्या आहेत, बॅलेन्सशिट समोर ठेवल्या आहेत. कंपन्यांच्या बॅलेन्सशिटवर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत. यावरून आर्थिक नफा त्यांना मिळताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड हे तिघेही आहेत. हे सर्व गंभीर असल्याचे अजित पवारांचे म्हणणे पडले. तसेच विविध कायद्यातील तरतुदी पाहता हा दखलपात्र गुन्हा आहे, हेही समोर ठेवले. निवडणूक आयोगाने ठरवले तर त्यांचे मंत्रिपदच काय तर आमदारकीही रद्द होऊ शकेल. हे होईल असे मला दिसत आहे. आता कारवाई केली नाही, तर स्वतःहून दखल घेऊन कारवाई करण्याबाबत सीजेंना पत्र लिहिले आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानियाwalmik karadवाल्मीक कराड