शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

अजित पवारांशी काय चर्चा झाली? कोणते आश्वासन मिळाले? अंजली दमानिया यांनी सगळी माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:07 IST

Anjali Damania Met DCM Ajit Pawar: उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

Anjali Damania Met DCM Ajit Pawar: सुमारे २५ ते ३० मिनिटे चर्चा झाली. बीडची घटना माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यावर माझे म्हणणे होते की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही. या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज मी त्यांना दाखवले आहे की, कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांत आर्थिक नफा कसा मिळत आहे. तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे सांगितले. गृह मंत्रालयाने आमदार, मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले आहेत, तेही दाखवले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय आश्वासन दिले, याबाबत अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक

लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. तसेच त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे सोकॉल्ड समर्थक, ते समर्थक नाहीत तर दहशतवादी आहेत. बीडमध्ये त्यांची दहशत आहे. यासंदर्भातील सगळे फोटो, रिल्स दाखवले. हे सगळे अजित पवार यांनी शांतपणे पाहिले आणि त्यांनी असे सांगितले आहे की, उद्या दुपारी १२ वाजता त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आहे. त्या बैठकीत ही सगळी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय ते घेणार आहेत. मला खात्री आहे की, जनभावना आहे, आक्रोश आहे, जे कृत्य झाले ते फारच निर्घृण होते. त्यामुळेच आपण हा लढा देत आहोत. हे मी त्यांना सांगितले. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेले कृत्य यापुढे कधीही होऊ नये, असे महाराष्ट्रात घडू नये. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे तातडीने आवश्यक आहे, असे मी त्यांना सांगितले, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का? असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर मी समोर ठेवलेली माहिती त्यांनी ज्या पद्धतीने पाहिली, त्यावरून त्यांना अनेक गोष्टींची माहिती नसावी. हे सगळे मिळून काय करत आहेत. सुदर्शन घुले असो, विष्णू चाटे असो, या सगळ्यांची कशी मिलीभगत आहे आणि ते लोकांवर कसा दबाव आणत आहेत. सामान्य माणसाला जगणे कसे कठीण आहे, हे सगळे दाखवले. यापुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको. म्हणूनच मी त्यांना विनंती केली की, त्यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ दे. सगळे काय ते बाहेर निघेल, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

...तर धनंजय मुंडे यांचे केवळ मंत्रिपद नाही, तर आमदारकी रद्द होऊ शकते

अजित पवार यांचे म्हणणे होते की, तपासात काही आढळले तर आम्ही पुढे काय करायचे ते पाहू. अजित पवारांची ही भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर, मी आज त्यांना जे पेपर दाखवले आहेत, त्यानंतर कोणती शंका राहणे शक्यच नाही. पुराव्यानिशी गोष्टी दाखवल्या आहेत, बॅलेन्सशिट समोर ठेवल्या आहेत. कंपन्यांच्या बॅलेन्सशिटवर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत. यावरून आर्थिक नफा त्यांना मिळताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड हे तिघेही आहेत. हे सर्व गंभीर असल्याचे अजित पवारांचे म्हणणे पडले. तसेच विविध कायद्यातील तरतुदी पाहता हा दखलपात्र गुन्हा आहे, हेही समोर ठेवले. निवडणूक आयोगाने ठरवले तर त्यांचे मंत्रिपदच काय तर आमदारकीही रद्द होऊ शकेल. हे होईल असे मला दिसत आहे. आता कारवाई केली नाही, तर स्वतःहून दखल घेऊन कारवाई करण्याबाबत सीजेंना पत्र लिहिले आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानियाwalmik karadवाल्मीक कराड