शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

‘कोरे’गाव ठरले प्राचीन ‘अक्षर’गाव!

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

‘लोकमत’ ठरला साक्षीदार : केदारेश्वर मंदिर परिसरातील इतिहास संशोधन रोचक टप्प्यावर

सातारा : ‘गोवत्स’ आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे कोरेगावातील एकाच शिलालेखावर आढळल्याने इतिहासाने वेगळेच वळण घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ‘गधेगाळ’ मूळ शिलालेखावर नंतर कोरण्यात आली आहे. कायदा कडक करणे, सामाजिक उलथापालथ किंवा राजसत्तेतील बदल यापैकी काहीतरी दहाव्या शतकात घडले होते, असे हा शिलालेख सूचित करतो.साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेने डिसेंबर २०१४ पासून कोरेगावातील केदारेश्वर मंदिर परिसरातील शिल्पांचे संशोधन सुरू केले. ते आता रोचक वळणावर आले असून, या प्रवासाचा ‘लोकमत’ साक्षीदार आहे. ‘बाराशे वर्षांपासून नांदतेय कोरेगाव’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने २३ मार्चच्या अंकात सचित्र वृत्तांत प्रसिद्ध केला होता. जमिनीत निम्मा गाडलेला शिलालेख कोरेगाव ग्रामपंचायतीच्या परवानगीने मोकळा केल्यानंतर अद्भुत दृश्य दिसले. गोवत्स आणि गधेगाळ ही चिन्हे एकाच शिलालेखावर दिसली. या दोन्ही ‘चित्ररूपी आज्ञा’ असून, एक सौम्य तर दुसरी प्रखर आहे. सौम्य आज्ञेचे पालन होत नसल्याचे दिसल्यानंतर प्रखर आज्ञा कोरली गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हा शिलालेख साधारण चार फूट उंच आणि पावणेदोन फूट रुंदीचा असून, त्याच्या वरील भागावर चंद्र-सूर्य कोरले आहेत. राजाचे साम्राज्य चंद्र-सूर्य असेपर्यंत राहील असा याचा अर्थ. त्याखाली शिवलिंग, खड्ग आणि गोवत्स म्हणजे गायवासरू आहेत. राजा शिवउपासक आहे, असा शिवलिंगाचा अर्थ. त्याने ही जमीन देवाला दान केली असल्याचे गायवासरू हे निदर्शक आहे. या संशोधनातून कोरेगावचा बाराशे वर्षांचा इतिहास उलगडू लागला होता. परंतु शिलालेख अर्धा जमिनीत असल्याने त्यावरील ओळी वाचता येत नव्हत्या. शिलालेख जमिनीतून मोकळा केल्यानंतरही जीर्ण अक्षरे वाचता येत नव्हत्या; परंतु सागर गायकवाड यांनी अभिनव युक्ती वापरली आणि अक्षरे दिसू लागली. अक्षराच्या वळणावरून हा दहाव्या शतकातील संस्कृतमिश्रित मराठी लेख असल्याचे स्पष्ट होत असल्याने मराठी आणि कोरेगाव दोहोंच्या दृष्टीने ही सुवार्ता ठरली आहे. (प्रतिनिधी)‘गधेगाळ’ म्हणजे काय...सामान्यत: ‘गधेगाळ’ किंवा ‘गद्धेगाळ’ म्हणजे एक शापवाणी किंवा चित्ररूपी अपशब्द होय. एखादी राजाज्ञा किंवा दानपत्रातील गोष्टींचा जो गैरवापर करेल, तो गाढव योनीत जन्माला येऊन आपल्या आईशी रत होईल, अशा अर्थाची ही शापवाणी होय. ती लिखित स्वरूपात क्वचित आढळते. अशिक्षित व्यक्तीलाही राजाज्ञेचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून या शापवाणीचे शिल्पांकनच आढळते. यात गाढव आणि स्त्रीचा समागम चित्रित केलेला असतो. सातारच्या संग्रहालयातही एक अरबी भाषेतील गधेगाळ आहे. त्यावर ‘अल होमार’ म्हणजेच ‘गाढवाचा लेक’ अशी अक्षरे कोरली आहेत. ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे तिचा अभ्यास करीत आहेत. इतिहास काय सांगतोशिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा, वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, सज्जनगड असे दुर्ग शिलाहारांनी बांधले. गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराच्या कामात जवळजवळ दोन पिढ्या खर्ची पडल्या. कोपेश्वराबरोबरच गंडरादित्याने हिंदू मंदिरांबरोबरच जैन आणि बुद्ध मंदिरेही बांधली. गंडरादित्याची पत्नी कर्णावती जैन धर्माचे आचरण करणारी होती. कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणारे शिलाहार आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे करीत. त्यावरून ते तगरनगरातून आले होते, हे स्पष्ट होते. हे तगर म्हणजे मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय. नाव एक, कहाण्या दोनसंपूर्ण कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वत:ला विद्याधर राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत. प्राचीन दंतकथेनुसार जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडविण्यासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले होते. या प्रसंगापासूनच त्यांच्या कुळाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडल्याचे मानले जाते.प्रिन्स आॅफ वेल्स संग्रहालयात असलेल्या शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात ‘सिलार’ नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे म्हटले गेले, असाही एक मतप्रवाह आहे.कोण होते शिलाहार...शिवकाळाच्या सहाशे वर्षे आधीच उदयाला आलेली एक महासत्ता म्हणजे शिलाहार होतशिलाहार राजांनी प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पाहिले असले तरी त्यांची राजवट प्रबळ होती. मांडलिकत्व केवळ नामधारी होतेहे राजे स्वत:ला महामंडलेश्वर, कोकणाधीश, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशी बिरुदे लावीत असतकोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर बांधणारा गंडरादित्य हाही शिलाहार राजा होयअंधश्रद्धांना विरोध करणारा गंडरादित्य स्वत:ला ‘शनिवारसिद्ध’ म्हणजेच घातवारी हाती घेतलेले कामही सिद्धीस नेणारा, असे बिरुद लावीत असेदक्षिणेकडील अत्यंत शूर आणि दिग्विजयी अशा चोला राजांचा पराभव शिलाहार राजांनी खिद्रापूर येथे केला होताशिवरायांना अत्यंत उपयुक्त ठरलेल्या गिरिदुर्गांचा निर्माता म्हणून राजा भोज द्वितीय याचा उल्लेख होतो.