शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 08:02 IST

-योगेश बिडवई  मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ ...

-योगेश बिडवई मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. 

एकीकडे शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी तर दुसरीकडे शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. थोडक्यात यंदा प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागात कांदा वांदा करणार आहे. 

राज्यातील ६० ते ७० मतदारसंघांत कांदा उत्पादन होते. तसेच दरवाढीमुळे शहरातील ५० ते ६० मतदारसंघांत हा महागाईचा मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे लोकसभेच्या साधारण १५ मतदारसंघांत सत्ताधारी युतीला फटका बसला होता. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने निर्यात खुली झाली. मात्र, त्यावर शुल्क कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा रोष कमी झाला नव्हता. त्यानंतर भाव हळूहळू वाढू लागले. मात्र, सप्टेंबरनंतर शेतकऱ्यांच्या कांदा संपू लागलाच भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाला आहे. 

तणनाशकांवर मोठा खर्च

सतत ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे खरीप कांद्याचे (पोळ) यंदा उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे तण काढण्यासाठी लागणाऱ्या तणनाशकांवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. 

१५ दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीत दोन टन कांदा विकला. एक एकर क्षेत्रावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र, शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने ७० टक्के नुकसान झाले. प्रतवारीनुसार कांद्याला क्विंटलमागे ३,२००, २,६००, २,२०० आणि १,३०० रुपये असा भाव मिळाला. कांद्याचे ३८ हजार रुपये झाले. घरातील सर्वजण शेतात काम करत असल्याने मजुरी वाचली, तरीही लागवडीपासून सोलापूर बाजार समितीत कांदा नेण्याचा २५ हजार खर्च झाला. हातात केवळ १३ हजार आले.-सोमिनाथ घोळवे, कांदा उत्पादक, मुंडेवाडी (जि. बीड) 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४onionकांदाNashikनाशिकBeedबीड