शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:26 IST

Amol Kolhe News: महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दिसते आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे लोकसभा निवडणूक रिंगणात असून, त्यांच्याविरोधात अजित पवार गटाने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अन्य केंद्रीय नेत्यांना यावे लागतेय, यावरूनच महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसत आहे, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला.

कांदाप्रश्नी बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, कांदा निर्यात बंदी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे. प्रत्येक मेट्रिक टनावर ५५० डॉलर हा चार्ज तर ४० टक्के निर्यात शुल्क लावली गेली आहे. हे सर्व तसेच वाहतूक खर्च जोडता जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर हा ६५ ते ७० रुपये इतका होईल. ही निर्यात बंदी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे, या शब्दांत अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले. 

शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यास तयार होतील

शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठका, कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, उन्हाचा तडका वाढल्याने उन्हाचा त्रास प्रत्येकाला जाणवतो. आवाजाचा त्रास झाल्याचा मला समजले. तीन ते चार सभा एकाच दिवशी महाराष्ट्रभर घेत आहेत. त्यामुळे एक दिवसाचा आराम झाला की, पवार साहेब पुन्हा त्याच ऊर्जेने व ताकदीने महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी तयार होतील, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढे सर्व असताना पंतप्रधान आणि केंद्रातील नेत्यांना यावे लागते आहे. यावरून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे दिसून येते त्यामुळे एवढे धावाधाव करावी लागते. महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४