शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:11 IST

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महायुतीची सर्व सूत्रे केंद्रातून नियंत्रित होती. निकालावर आमच्या कोअर कमिटीतही चर्चा झाली. कारणांचा आढावा घेतला गेला. मतदारांनी का नाकारले हा खूप मोठा विषय आहे. वरिष्ठांनी त्यावर मंथन केले आहे. त्याचे मुद्देही काढले आहेत. ३ पक्षांचे महायुतीचे सरकार झाल्यामुळे असा निकाल लागला का यावर अनेकांनी मतमतांतरे आहेत. मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीत आल्याने ३५-४० विधानसभा मतदारसंघ आणि ५-६ लोकसभा मतदारसंघावर परिणाम झाला जिथं भाजपाची ताकद होती असा दावा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अजित पवारांसोबत आलेले आमदार आणि भाजपाचे तिथले उमेदवार यांच्यात बहुतांश ठिकाणी संघर्ष झालेला आहे. काही मतदारसंघात शिवसेनेशी संघर्ष असेल परंतु सर्वाधिक संघर्ष राष्ट्रवादीशी झाला. राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जे ५३ आमदार निवडून आले होते त्यातील बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील होते. त्यात पुणे जिल्ह्यात ११ आमदार होते. त्यामुळे सहाजिकच तिथे लढत भाजपाशी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला हा फॅक्टर इतका दिसून आला नाही मात्र विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांना याचा विचार गांभीर्याने करावाच लागणार आहे असं त्यांनी सांगितले. मुंबई तकच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच ही कोंडी सोडवणार कशी?, जसजशा निवडणूक छोटी होत जाते, तशी स्पर्धा वाढत जाते. आता लोकसभेत २२-२३ लाख मतदान असते, ६ विधानसभेचा समावेश असतो. विधानसभेत अडीच तीन लाख मतदान, १५०-२०० गावे, त्यात एखादी नगरपालिका किंवा महानगरपालिका येऊ शकते. त्यामुळे जेवढे स्थानिक पातळीवर निवडणूक येईल तेवढी स्पर्धा वाढते. आमच्या नेतृत्वाने विचार करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मते ट्रान्सफर करण्याची परिस्थिती आता राहिली नाही. प्रत्येक घरामध्ये मतदार कुणाला मत द्यायचे याचा विचार करतो. एक काळ असा होता, चावडीवर बसून कुणाला मतदान करायचे हा निर्णय व्हायचा, तो निर्णय लोक ऐकायचे परंतु आता तशी परिस्थिती नाही. महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही. आता तालुक्यात आमचं फिरणं सुरू आहे. लोकांचा प्रचंड आग्रह आहे तुम्ही लढलं पाहिजे. मतदार उघडपणे बोलायला लागला आहे. ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालावीच लागणार आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माणसं हेरण्याचा प्रयत्न करणारच आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४