शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:11 IST

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महायुतीची सर्व सूत्रे केंद्रातून नियंत्रित होती. निकालावर आमच्या कोअर कमिटीतही चर्चा झाली. कारणांचा आढावा घेतला गेला. मतदारांनी का नाकारले हा खूप मोठा विषय आहे. वरिष्ठांनी त्यावर मंथन केले आहे. त्याचे मुद्देही काढले आहेत. ३ पक्षांचे महायुतीचे सरकार झाल्यामुळे असा निकाल लागला का यावर अनेकांनी मतमतांतरे आहेत. मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीत आल्याने ३५-४० विधानसभा मतदारसंघ आणि ५-६ लोकसभा मतदारसंघावर परिणाम झाला जिथं भाजपाची ताकद होती असा दावा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अजित पवारांसोबत आलेले आमदार आणि भाजपाचे तिथले उमेदवार यांच्यात बहुतांश ठिकाणी संघर्ष झालेला आहे. काही मतदारसंघात शिवसेनेशी संघर्ष असेल परंतु सर्वाधिक संघर्ष राष्ट्रवादीशी झाला. राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जे ५३ आमदार निवडून आले होते त्यातील बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील होते. त्यात पुणे जिल्ह्यात ११ आमदार होते. त्यामुळे सहाजिकच तिथे लढत भाजपाशी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला हा फॅक्टर इतका दिसून आला नाही मात्र विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांना याचा विचार गांभीर्याने करावाच लागणार आहे असं त्यांनी सांगितले. मुंबई तकच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच ही कोंडी सोडवणार कशी?, जसजशा निवडणूक छोटी होत जाते, तशी स्पर्धा वाढत जाते. आता लोकसभेत २२-२३ लाख मतदान असते, ६ विधानसभेचा समावेश असतो. विधानसभेत अडीच तीन लाख मतदान, १५०-२०० गावे, त्यात एखादी नगरपालिका किंवा महानगरपालिका येऊ शकते. त्यामुळे जेवढे स्थानिक पातळीवर निवडणूक येईल तेवढी स्पर्धा वाढते. आमच्या नेतृत्वाने विचार करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मते ट्रान्सफर करण्याची परिस्थिती आता राहिली नाही. प्रत्येक घरामध्ये मतदार कुणाला मत द्यायचे याचा विचार करतो. एक काळ असा होता, चावडीवर बसून कुणाला मतदान करायचे हा निर्णय व्हायचा, तो निर्णय लोक ऐकायचे परंतु आता तशी परिस्थिती नाही. महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही. आता तालुक्यात आमचं फिरणं सुरू आहे. लोकांचा प्रचंड आग्रह आहे तुम्ही लढलं पाहिजे. मतदार उघडपणे बोलायला लागला आहे. ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालावीच लागणार आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माणसं हेरण्याचा प्रयत्न करणारच आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४