शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

शेतक-यांप्रति सरकार असंवेदनशील , अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:10 IST

शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

जळगाव : शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बुधवारी जळगावात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘व्हीजन २०१९’ शिबिरात खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, भाई जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते मंडळी उपस्थित होती.जनतेचे प्रश्न सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्यामुळे भावनिक व जातीय मुद्दे उपस्थित करून लोकांची मने विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रातील मंत्रीच राज्यघटना बदलण्याची भाषा करू लागले आहेत. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. भाववाढ अटळ असून, या इंधन दरवाढीविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.साहेब, स्वबळावर लढा!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसने इतर पक्षाशी आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. लोकांना ‘पंजा’चा विसर पडू नये, यासाठी तरी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धरला.बुलेट ट्रेन नको- पृथ्वीराजबुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य असून, त्यावर होणारा भरमसाठ खर्च रेल्वेच्या इतर विकासासाठी खर्च केल्यास मोठा फायदा होऊ शकतो़ निविदा न काढता जपानला कंत्राट दिल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरी