शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सर्व शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:59 IST

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून थकलेले शुल्क वसूल करण्यास मनाई

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शुल्क, सीईटी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आदी मुद्द्यांवर चर्चा ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन एरिया’ या संघटनेतर्फे बैठक

पुणे: राज्यातील शैक्षणिक संस्थांना राज्य शासनाकडून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे शुल्क वेळेत दिले जात नाही. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी 2020 - 21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारण्याचा निर्णय 'असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया' या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच सीईटी परीक्षा रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थी व संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन एरिया’ या संघटनेतर्फे संस्थाचालक व प्राचार्य यांची झूम अ‍ॅपद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचे शुल्क, सीईटी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  असोसिएशनचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. परंतु, या विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनातर्फे कधीही वेळेत दिले जात नाही. राज्य शासनाने शिक्षण संस्थांना 2019 - 20 व त्यापूवीर्ची थकलेली संपूर्ण रक्कम अदा करावी व पुढील वर्षाच्या प्रवेशाच्या वेळी 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे 90 टक्के उचल स्वरूपात रक्कम द्यावी. अन्यथा सर्व शिक्षण संस्थांकडून  2020 - 21 या वर्षातील प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले जाईल,असा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून थकलेले शुल्क वसूल करण्यास मनाई करण्यात आली आहे.मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व अखिल भारतीय औषध निर्माण शास्त्र परिषद यांनी सर्व प्राध्यापकांचे पगार वेळेत द्यावेत,असे आदेश दिले आहेत. परंतु, विना अनुदानित महाविद्यालयांकडे निधी नसल्यामुळे पगार देण्यात अडचणी येत आहेत. एआयसीटीईचे संचालक डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र शासनाला शैक्षणिक संस्थांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु ,याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत, असेही झोळ यांनी सांगितले.--------------साखर कारखान्यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी अधिवास प्रमाणपत्र देण्याची अट रद्द करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्र अपूर्ण असल्यास हमी पत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात यावा ,अशीही भूमिका असोसिएशनतर्फे यावेळी मांडण्यात आली.

-----------इयत्ता बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) दिल्या नाही तर विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य शासनाने सीईटी प्रवेश फेरी शिवाय किंवा समुपदेशन फेरीमध्ये सीईटीचे विद्यार्थी संपल्यानंतर सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मान्यता द्यावी,अशी मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस