शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

अजित पवारांच्या इशाऱ्याने गयारामांची धाकधूक वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 11:41 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

मुंबई - सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपल्यावर असलेले गुन्हे आणि विविधी चौकशा थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यामुळे गयारामांची धाकधूक वाढणार आहे.

भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. परंतु, ज्यावेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल, त्यावेळी हे नेते सैरभैर होणार, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला आहे. मात्र विधानसभेला केवळ २८८ जागाच लढवता येणार आहे. शिवसेना-भाजप युती होणार हे भाजपकडून सांगितले जात आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. त्यात अपक्षांचा पाठिंबा त्यांनाच आहे. अशा स्थितीत गयारामांना सामावून घेताना भाजपला कसरत करावी लागणार आहे. या स्थितीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गयाराम सैरभैर होणार, असा दावा पवारांनी केला.

दरम्यान भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गयारामांची स्थिती अवघड होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल, असंही त्यांनी सांगितले. पुण्यातील मर्चंट बँकेच्या शाखेचे नवीन कार्यालयात स्थलांतर झाले. या कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.