शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आलीय; अजित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:14 IST

गेल्या तीन महिन्यात पोलिसांवर ३० हून अधिक हल्ल्याच्या घटना

Ajit Pawar Devendra Fadnavis: राज्यात सध्या भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. कोणत्याही राज्यातील पोलीस हे सदैव जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. पण सध्या महाराष्ट्रात अशी विचित्र परिस्थिती ओढवली आहे की पोलिसांवर काही लोकांकडून हल्ले केले जात आहेत. या घटना वाढत गेल्या तर अनर्थ होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रात पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.

"राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी," अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

"राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनात वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इत्यादी गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यावर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करा," असे अजित पवार यांनी सुचवले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र