शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"झाले ते एका अर्थी बरे झाले...", राष्ट्रवादी सत्तेत जाताच कुमार केतकरांची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:22 IST

पवार विरूद्ध पवार या द्वंद्वाचा काँग्रेसला कसा फायदा होईल हेदेखील केतकरांनी सांगितलं

Congress Kumar Ketkar on Ajit Pawar Sharad NCP Rift: राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असतानाच, रविवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने भाजपा-शिवसेना युतीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या रूपाने राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. तर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. त्यामुळे हे सारं शरद पवारांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा सूर सुरूवातीला उमटला होता. पण आमचा अजितदादांना पाठिंबा नाही, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी यावर वेगळेच पण सूचक मत मांडले. तसेच, या बंडाचा काँग्रेसला कसा फायदा होईल हेदेखील सांगितले.

"राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यासाठी शिवकालीन इतिहासाचे संदर्भ असले तरी ते देण्याची गरज नाही. त्यांची नाळ नरेंद्र मोदींच्या फॅसिस्ट राजकारणाशी जुळते हे २०१४ पासूनच दिसले आहे. एका अर्थाने झाले हे बरे झाले. आता काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकेल वा शक्य झाल्यास उद्धव ठाकरेंबरोबर समझोता करू शकेल. असेही म्हणता येईल की शरद पवारही त्यांच्या पक्षांच्या शृंखलांमधून मुक्त झाले आहेत. पवार समर्थकांना आता तळ्यात-मळ्यात राहण्याचे सोयीचे राजकारण करता येणार नाही", असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

"इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये त्यांच्या पक्षातील पंचमस्तंभीयांना असेच आव्हान देऊन नामोहरम केले होते. इडी - सीबीआयला घाबरून जे भेकड शरद पवारांना सोडून गेले आहेत यांची गत पूर्वीच्या सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय परिस्थिती होणार हे स्पष्ट आहे. या मंडळींच्या जाण्याने मविआ संपली पण फॅसिझम विरोधी शक्ती मात्र बळकट होऊ शकतील, कपट-कारस्थानांचे मोदी-शहांचे राजकारण भले त्यांच्या भक्तांना 'मास्टरस्ट्रोक' वाटत असेल, पण या मास्टरस्ट्रोकचा त्रिफळा कसा उडतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता काँग्रेसने पूर्ण आमविश्वासाने आणि स्वबळाने, राहुल गांधींप्रमाणे लोकांमध्ये जाऊन पक्ष समर्थ करायल हवा – आता हवा अधिक स्वच्छ झाली आहे", अशी प्रतिक्रयाही काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस