शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"झाले ते एका अर्थी बरे झाले...", राष्ट्रवादी सत्तेत जाताच कुमार केतकरांची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:22 IST

पवार विरूद्ध पवार या द्वंद्वाचा काँग्रेसला कसा फायदा होईल हेदेखील केतकरांनी सांगितलं

Congress Kumar Ketkar on Ajit Pawar Sharad NCP Rift: राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असतानाच, रविवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने भाजपा-शिवसेना युतीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या रूपाने राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. तर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. त्यामुळे हे सारं शरद पवारांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा सूर सुरूवातीला उमटला होता. पण आमचा अजितदादांना पाठिंबा नाही, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी यावर वेगळेच पण सूचक मत मांडले. तसेच, या बंडाचा काँग्रेसला कसा फायदा होईल हेदेखील सांगितले.

"राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यासाठी शिवकालीन इतिहासाचे संदर्भ असले तरी ते देण्याची गरज नाही. त्यांची नाळ नरेंद्र मोदींच्या फॅसिस्ट राजकारणाशी जुळते हे २०१४ पासूनच दिसले आहे. एका अर्थाने झाले हे बरे झाले. आता काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकेल वा शक्य झाल्यास उद्धव ठाकरेंबरोबर समझोता करू शकेल. असेही म्हणता येईल की शरद पवारही त्यांच्या पक्षांच्या शृंखलांमधून मुक्त झाले आहेत. पवार समर्थकांना आता तळ्यात-मळ्यात राहण्याचे सोयीचे राजकारण करता येणार नाही", असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

"इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये त्यांच्या पक्षातील पंचमस्तंभीयांना असेच आव्हान देऊन नामोहरम केले होते. इडी - सीबीआयला घाबरून जे भेकड शरद पवारांना सोडून गेले आहेत यांची गत पूर्वीच्या सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय परिस्थिती होणार हे स्पष्ट आहे. या मंडळींच्या जाण्याने मविआ संपली पण फॅसिझम विरोधी शक्ती मात्र बळकट होऊ शकतील, कपट-कारस्थानांचे मोदी-शहांचे राजकारण भले त्यांच्या भक्तांना 'मास्टरस्ट्रोक' वाटत असेल, पण या मास्टरस्ट्रोकचा त्रिफळा कसा उडतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता काँग्रेसने पूर्ण आमविश्वासाने आणि स्वबळाने, राहुल गांधींप्रमाणे लोकांमध्ये जाऊन पक्ष समर्थ करायल हवा – आता हवा अधिक स्वच्छ झाली आहे", अशी प्रतिक्रयाही काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस