शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:44 IST

Sharad Pawar Speech: भुजबळांवरही वार, शिवसेना-भाजपातील हिंदुत्वाचा फरक सांगितला, शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. - शरद पवार

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. शरद पवारांचे वागणे कसे दुटप्पी असते हे त्यांनी सांगितले. यावर शरद पवारांनी देखील पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर, पक्षावर आणि चिन्हावर दावा अजित पवार गटाने दावा केल्यावर मी वेगळा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली होती, असे सांगितले. 

शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे. माझ्या नाव, फोटोशिवाय यांचे नाणे चालणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले. 

23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असे शरद पवार म्हणाले. 

चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. ज्या लोकांनी आमदारांना निवडून दिले ते आमच्यासोबत आहेत असे सांगतानाच भुजबळांनी बघुन येतो म्हणून सांगून गेले आणि दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतली, अशी टीका पवार यांनी केली. भाजपासोबत आम्ही गेलो त्यात काही चूक नाही, असे ते म्हणतात. जे जे लोक भाजपासोबत गेले त्यांचे सरकार चालले नाही. त्या पक्षांना संपविले. पंजाब, तेलंगाना, आंध्रप्रदेश, बिहारमध्ये झाले. भाजपासोबत सरकार काही महिने ठीक चालते, त्यानंतर जो सहकारी आहे त्याला उध्वस्त करणे, तोडफोड करणे हे होते. आज जो तुम्ही निर्णय घेतलात तो चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. एक लक्षात ठेवा या राज्यांत जे घडले तेच तुमच्यासोबत घडणार आहे, असा इशारा देखील पवार यांनी अजित पवारांना दिला. 

शिवसेना आणि भाजपात फरक आहे. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होते. बाळासाहेबांनी तेव्हा पत्रक काढले, इंदिरा गांधी संकटात आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेने एकही उमेदवार दिला नाही. काँग्रेसने विधानपरिषदेत शिवसेनेच्या लोकांना जागा दिली. भाजपाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेशवादी, मनुवादी आणि विघातक आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदुत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे, असा दोन पक्षांतील हिंदुत्वाचा फरक पवारांनी सांगितला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष