शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:08 IST

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अकोला : राज्याच्या सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं, असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. 

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार, तर अजित पवार हे शिव-शाहू फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार असल्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मध्यंतरी आपण प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तसेच, १३ ऑक्टोबर रोजी अकोला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित अकोल्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्यानेही चर्चा रंगली आहे. 

एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच अमोल मिटकरी यांनी केलेल्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेल्याची चर्चा होती. यावर अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार महायुतीमध्ये नाराज नाहीत, जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये खटका उडवल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्या पसरवण्याचे उगमस्थान तुतारी गट तसेच मविआतून आहे. 

जाणीवपूर्वक अजित पवार आणि महायुती सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली. याशिवाय, ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील जनतेचा आपल्यावर उमेदवारीसाठी दबाव आणि आग्रह आहे. सध्याच्या भाजप आमदारांबद्दल लोकमानसामध्ये नाराजीची भावना असल्याची जनतेची माहिती आहे. अकोट ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे. याबद्दल पक्षाध्यक्ष अजित दादांकडे म्हणणं मांडणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण