शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:50 IST

सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते असं त्यांनी सांगितले.

मुंबई - येत्या सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक पार पडणार आहे. सत्ताधारी NDA घटक पक्षांमध्ये सर्व सुरळीत आहे अशी चिन्हे नाहीत. तिथेच बऱ्याच उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय एनडीएच्या उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष फारशी मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळेच येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बरेच राजकीय बदल घडतील अशी शक्यता असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटलं की, केंद्र सरकारमध्ये सध्याच्या घडीला फार मोठे बदल घडताना दिसतात. तिथे सत्तेची गणिते बिघडलेली दिसतात. उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक आहे, त्यात NDA उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष समर्थन देताना दिसत नाहीत. त्यामुळेच मविआ नेत्यांसोबत बोलण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यात एकनाथ शिंदे स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. कॅबिनेटच्या बैठकीलाही ते गेले नाहीत असं बोलले जाते. अनेक गोष्टी आणि अनेक बदल येत्या काही दिवसात घडताना दिसतील असं त्यांनी म्हटलं. 

तसेच सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते. त्याचेच पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात. देवेंद्र फडणवीसांना त्यासाठीच जबाबदारी दिलेली आहे. आताच्या घटकेला एकनाथ शिंदे यांना स्वत:सोबत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही असंही अंजली दमानिया यांनी सांगितले. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

राज ठाकरे भाजपासोबत जातील...

दरम्यान, राज ठाकरे हे भाजपासोबत जातील असं वाटते. उद्धव ठाकरेंसोबत त्यांना भवितव्य नाही असं स्पष्टपणे दिसते. राज ठाकरे कधी ना कधी उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत हे चित्र मला दिसत होते परंतु मी स्पष्ट बोलले नव्हते. आताच्या घटकेला भाजपासमोर स्वत:चा भाव वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विधाने केली असतील. परंतु त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची कुठलीही इच्छा नसावी असं स्पष्टपणे वाटते असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा