शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यानंतर आता सांडपाण्यावरून टाच, प्राधिकरणाचा दे धक्का; सांडपाणी प्रक्रिया नाही तर जादा पाणी नाही

By यदू जोशी | Updated: September 5, 2018 01:45 IST

महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे.महापालिका वा नगरपालिकेने जादा पिण्याच्या पाण्याची मागणी केली अन् आधी मिळत असलेल्या आणि नव्याने मिळणार असलेल्या पाण्यापासून तयार होणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसेल तर जादा पाणीच दिले जाणार नाही, असे प्राधिकरणाने बजावले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणेदेखील अनिवार्य असेल.प्राधिकरणाचे सदस्य व्ही. एम.कुलकर्णी यांनी अलिकडे प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत याबाबत विस्ताराने माहिती दिली.महापालिका वा नगरपालिकेने किती पाणी घेतले, त्यापैकी किती पाण्याचा वापर केला, किती पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केली याची माहिती आॅनलाइन आदीद्वारे सार्वजनिक करणे आता प्राधिकरणाने बंधनकारक आहे. त्याशिवाय जादा पाणी दिले जाणार नाही.सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत आणि साठे प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला नाही तर नैसर्गिक पाण्याचा वापर वाढतो.दरमाणशी पाण्याच्या कोट्याचे उल्लंघन- दरमाणशी पाण्याच्या कोट्याचे सात महापालिकांनी उल्लंघन केले आहे. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यांना दररोज माणशी १३५ लिटर अधिक १५ टक्के (म्हणजे जवळपास २० लिटर) असा १५५ लिटर पाण्याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या नियमानुसार ११५ ते १४० टक्के इतके पाणी दरमाणशी वापरल्यास पाणी दरापेक्षा दीडपट वसुली स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जलसंपदा विभाग करतो. १४० लिटरपेक्षा अधिक वापर असल्यास दुप्पट पाणीदराने आकारणी केली जाते.- पाणी वापराच्या दरमाणशी मानकापेक्षा अधिक पाण्याचा वापर त्या शहरात पाण्याची चोरी होत असेल, प्रचंड बांधकामे होत असतील तर प्रामुख्याने होतो. अशा शहरांकडून दंडासह पाणीदर आकारले जात असले तरी ती दंडाची रक्कम फारच कमी असल्याने संपन्न महापालिका दंडाची फिकीर करीत नाहीत. त्यामुळे हा दंड जबर असावा, अशी मागणी होत आहे.सात शहरांची पाणीवापर स्थितीशहर पाणीवापर मर्यादा दरदिवशी(१३५ लिटर अधिक (आकडे लिटरमध्ये)१५ टक्के पाणीव्यय) (आकडे लिटरमध्ये)पुणे १५५ २९०ठाणे १५५ २५९नागपूर १५५ २२८कल्याण १५५ २१८पिंपरी-चिंचवड १५५ २९४धुळे १५५ १९४नाशिक १५५ १६७

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र