शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यानंतर आता सांडपाण्यावरून टाच, प्राधिकरणाचा दे धक्का; सांडपाणी प्रक्रिया नाही तर जादा पाणी नाही

By यदू जोशी | Updated: September 5, 2018 01:45 IST

महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे.महापालिका वा नगरपालिकेने जादा पिण्याच्या पाण्याची मागणी केली अन् आधी मिळत असलेल्या आणि नव्याने मिळणार असलेल्या पाण्यापासून तयार होणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसेल तर जादा पाणीच दिले जाणार नाही, असे प्राधिकरणाने बजावले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणेदेखील अनिवार्य असेल.प्राधिकरणाचे सदस्य व्ही. एम.कुलकर्णी यांनी अलिकडे प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत याबाबत विस्ताराने माहिती दिली.महापालिका वा नगरपालिकेने किती पाणी घेतले, त्यापैकी किती पाण्याचा वापर केला, किती पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केली याची माहिती आॅनलाइन आदीद्वारे सार्वजनिक करणे आता प्राधिकरणाने बंधनकारक आहे. त्याशिवाय जादा पाणी दिले जाणार नाही.सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत आणि साठे प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला नाही तर नैसर्गिक पाण्याचा वापर वाढतो.दरमाणशी पाण्याच्या कोट्याचे उल्लंघन- दरमाणशी पाण्याच्या कोट्याचे सात महापालिकांनी उल्लंघन केले आहे. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यांना दररोज माणशी १३५ लिटर अधिक १५ टक्के (म्हणजे जवळपास २० लिटर) असा १५५ लिटर पाण्याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या नियमानुसार ११५ ते १४० टक्के इतके पाणी दरमाणशी वापरल्यास पाणी दरापेक्षा दीडपट वसुली स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जलसंपदा विभाग करतो. १४० लिटरपेक्षा अधिक वापर असल्यास दुप्पट पाणीदराने आकारणी केली जाते.- पाणी वापराच्या दरमाणशी मानकापेक्षा अधिक पाण्याचा वापर त्या शहरात पाण्याची चोरी होत असेल, प्रचंड बांधकामे होत असतील तर प्रामुख्याने होतो. अशा शहरांकडून दंडासह पाणीदर आकारले जात असले तरी ती दंडाची रक्कम फारच कमी असल्याने संपन्न महापालिका दंडाची फिकीर करीत नाहीत. त्यामुळे हा दंड जबर असावा, अशी मागणी होत आहे.सात शहरांची पाणीवापर स्थितीशहर पाणीवापर मर्यादा दरदिवशी(१३५ लिटर अधिक (आकडे लिटरमध्ये)१५ टक्के पाणीव्यय) (आकडे लिटरमध्ये)पुणे १५५ २९०ठाणे १५५ २५९नागपूर १५५ २२८कल्याण १५५ २१८पिंपरी-चिंचवड १५५ २९४धुळे १५५ १९४नाशिक १५५ १६७

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र