शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; "आता यापुढे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:39 IST

विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने झाली होती. अजितदादांच्या निधनामुळे ती चर्चा पूर्ण झाली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. विलीनीकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे दावे करत होते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टपणे खुलासा करत यापुढे विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. ही चर्चा आता थांबली आहे असं त्यांनी म्हटलं.

विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे. आता चर्चा पुढे जाणे शक्य नाही. आम्ही यावर कुणाशी चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत हे समजून घेणारा नेताच नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे आणि यापुढे विलीनीकरणाची शक्यता नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

तसेच राज्यसभेच्या एका जागेसाठी कुणी विरोध केला असे नाही. सध्या पक्षाच्या विद्यमान सदस्यांबद्दल पुन्हा जागेची मागणी पक्षनेतृत्वाने करणे यात काही चुकीचे आहे असं वाटत नाही. परंतु आमच्या कुठल्या नावाला त्यांच्याकडून विरोध झाला किंवा अन्य काही आक्षेप होते असं मला वाटत नाही. विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने झाली होती. अजितदादांच्या निधनामुळे ती चर्चा पूर्ण झाली नाही. आता विलीनीकरणाची शक्यता नाही. विलीनीकरण हा मुद्दा पूर्णपणे बाजूला गेला आहे. त्यामुळे आमच्या दोन्ही मित्रपक्षाला यात काही शंका नाही असंही जयंत पाटील यांनी दावा केला.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने अजितदादांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करावी. रोहित पवारांनी पायलटबाबत जो आक्षेप घेतला आहे. त्यांचा कॉल रेकॉर्ड, कुणाशी संभाषण झाले, गेले २-३ महिने पायलटला कोण भेटले याचा तपशील काढावा. सीआयडीने खोलवर या घटनेचा तपास करावा. एवढ्या मोठ्या नेत्याचे निधन झाल्यानंतर जी काही महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शंका आहे ते दूर करण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Merger Talks Halted: Jayant Patil Clarifies Future Stance

Web Summary : Jayant Patil stated NCP merger talks are over after Ajit Pawar's demise. No further discussions will occur. He also addressed Rajya Sabha seat concerns and demanded transparent probe into Pawar's plane accident.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीRajya Sabhaराज्यसभाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026