शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुमारीमाता २१ वर्षांनंतरही वाऱ्यावरच, शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:09 IST

एनजीओंचा विकास, पीडित तशाच । शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : फुलपाखराचे मन आणि रानफुलांचे वन लाभलेल्या शेकडो अजाण मुलींना संधीसाधूंनी क्षणिक मोहासाठी लुटले. आणि पोटुशी झाल्यावर वाºयावर सोडले. पोरवयातच लेकूरवाळ्या झालेल्या या अभागी मुलींना समाज ‘कुमारी माता’ हे उदात्त बिरुद चिटकवून मोकळा झाला. पण शासन आणि महिला आयोग केवळ पाहणी, आढावा आणि सर्वेक्षण करून थांबले आहेत.

झरी जामणी तालुक्यातील (जि. यवतमाळ) हा प्रश्न गेल्या २१ वर्षांपासून चरचरत आहे. ठेकेदार, तेलंगणातून येणारे ट्रक चालक, सावकार व गुंड-पुंडांनी अल्पवयीन मुलींना भोगले. कुडा-मातीच्या टीचभर झोपडीत राहणाºया या मुलींना जंगल नवे नाही. इतरांना मदत करणे, सर्वांशी प्रामाणिक राहणे हा या समाजाचा मूळ स्वभाव आहे. तोच हेरून अगदी दहा रुपयांचे आमिष दाखवून मुलींच्या अब्रूचा खेळ केला. तर शिक्षणाचा अभाव असल्याने, पीडित मुलींनाही अनेक दिवस आपण बळी ठरल्याची जाणच नव्हती. घरातल्या मंडळींनीही सुरवातीला आरडाओरड करून नंतर ‘हे असे गरिबांसोबत घडतच असते’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतली.गेल्या २५-३० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पण १९९७ पासून प्रसिद्धी माध्यमांनी ‘कुमारी मातां’चा हा प्रश्न जगापुढे आणला. त्यानंतर मुंबई-पुण्याच्या नेत्यांपासून तर महिला आयोगाच्या पदाधिकाºयांनी दौरे केले. सरकारने आकडेवारी गोळा केली. महिला आयोगानेही सर्वेक्षण केले. शासन आजही येथे ४८ कुमारी माता असल्याचे सांगते, पण गावकºयांच्या मते हा आकडा शंभराहून अधिक आहे.कोणीबी याचं, नाव लिवाचं... द्याचं काईच नाईशासनाचे प्रतिनिधी, अधिकारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि जातात. आपल्यासाठी काहीच करीत नाही, या भावनेतून झरीवासी प्रतिसादही द्यायला तयार नाही. ‘कोणीबी याचं नाव लिवाचं. द्याचं काईच नाई. कोणी मन्ते पोराले धरून फोटो काढ. कोणी मन्ते घरासंग उभी राहून फोटो काढू दे...’ अशा शब्दात एका कुमारी मातेने आपला संताप सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केला.‘त्या’ कोवळ्या जीवांचे काय?कुमारीमातांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांचा गंभीर प्रश्न आहे. अल्पवयात प्रसुत झालेल्या या मातांना बाळांची काळजी कशी घ्यावी, हेही निट ठाऊक नसते. ज्यांची मुले कशीबशी मोठी झाली, त्यांच्या शिक्षणाचा मोठा पेच आहे. शाळेत नाव टाकायचे तर बापाचे नाव हवे असते, जातीचा दाखला हवा असतो. काही जणींनी आजोबाचे (स्वत:च्याच वडिलाचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. तर काही जणींनी बापाच्या ऐवजी स्वत:चेच (आईचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. पण शाळेत गेल्यावरही ‘तुझा बाप कोण’ हा प्रश्न या मुलांना जगणे नकोसे करतोच.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला