शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुमारीमाता २१ वर्षांनंतरही वाऱ्यावरच, शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:09 IST

एनजीओंचा विकास, पीडित तशाच । शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : फुलपाखराचे मन आणि रानफुलांचे वन लाभलेल्या शेकडो अजाण मुलींना संधीसाधूंनी क्षणिक मोहासाठी लुटले. आणि पोटुशी झाल्यावर वाºयावर सोडले. पोरवयातच लेकूरवाळ्या झालेल्या या अभागी मुलींना समाज ‘कुमारी माता’ हे उदात्त बिरुद चिटकवून मोकळा झाला. पण शासन आणि महिला आयोग केवळ पाहणी, आढावा आणि सर्वेक्षण करून थांबले आहेत.

झरी जामणी तालुक्यातील (जि. यवतमाळ) हा प्रश्न गेल्या २१ वर्षांपासून चरचरत आहे. ठेकेदार, तेलंगणातून येणारे ट्रक चालक, सावकार व गुंड-पुंडांनी अल्पवयीन मुलींना भोगले. कुडा-मातीच्या टीचभर झोपडीत राहणाºया या मुलींना जंगल नवे नाही. इतरांना मदत करणे, सर्वांशी प्रामाणिक राहणे हा या समाजाचा मूळ स्वभाव आहे. तोच हेरून अगदी दहा रुपयांचे आमिष दाखवून मुलींच्या अब्रूचा खेळ केला. तर शिक्षणाचा अभाव असल्याने, पीडित मुलींनाही अनेक दिवस आपण बळी ठरल्याची जाणच नव्हती. घरातल्या मंडळींनीही सुरवातीला आरडाओरड करून नंतर ‘हे असे गरिबांसोबत घडतच असते’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतली.गेल्या २५-३० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पण १९९७ पासून प्रसिद्धी माध्यमांनी ‘कुमारी मातां’चा हा प्रश्न जगापुढे आणला. त्यानंतर मुंबई-पुण्याच्या नेत्यांपासून तर महिला आयोगाच्या पदाधिकाºयांनी दौरे केले. सरकारने आकडेवारी गोळा केली. महिला आयोगानेही सर्वेक्षण केले. शासन आजही येथे ४८ कुमारी माता असल्याचे सांगते, पण गावकºयांच्या मते हा आकडा शंभराहून अधिक आहे.कोणीबी याचं, नाव लिवाचं... द्याचं काईच नाईशासनाचे प्रतिनिधी, अधिकारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि जातात. आपल्यासाठी काहीच करीत नाही, या भावनेतून झरीवासी प्रतिसादही द्यायला तयार नाही. ‘कोणीबी याचं नाव लिवाचं. द्याचं काईच नाई. कोणी मन्ते पोराले धरून फोटो काढ. कोणी मन्ते घरासंग उभी राहून फोटो काढू दे...’ अशा शब्दात एका कुमारी मातेने आपला संताप सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केला.‘त्या’ कोवळ्या जीवांचे काय?कुमारीमातांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांचा गंभीर प्रश्न आहे. अल्पवयात प्रसुत झालेल्या या मातांना बाळांची काळजी कशी घ्यावी, हेही निट ठाऊक नसते. ज्यांची मुले कशीबशी मोठी झाली, त्यांच्या शिक्षणाचा मोठा पेच आहे. शाळेत नाव टाकायचे तर बापाचे नाव हवे असते, जातीचा दाखला हवा असतो. काही जणींनी आजोबाचे (स्वत:च्याच वडिलाचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. तर काही जणींनी बापाच्या ऐवजी स्वत:चेच (आईचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. पण शाळेत गेल्यावरही ‘तुझा बाप कोण’ हा प्रश्न या मुलांना जगणे नकोसे करतोच.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला