शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कुमारीमाता २१ वर्षांनंतरही वाऱ्यावरच, शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:09 IST

एनजीओंचा विकास, पीडित तशाच । शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : फुलपाखराचे मन आणि रानफुलांचे वन लाभलेल्या शेकडो अजाण मुलींना संधीसाधूंनी क्षणिक मोहासाठी लुटले. आणि पोटुशी झाल्यावर वाºयावर सोडले. पोरवयातच लेकूरवाळ्या झालेल्या या अभागी मुलींना समाज ‘कुमारी माता’ हे उदात्त बिरुद चिटकवून मोकळा झाला. पण शासन आणि महिला आयोग केवळ पाहणी, आढावा आणि सर्वेक्षण करून थांबले आहेत.

झरी जामणी तालुक्यातील (जि. यवतमाळ) हा प्रश्न गेल्या २१ वर्षांपासून चरचरत आहे. ठेकेदार, तेलंगणातून येणारे ट्रक चालक, सावकार व गुंड-पुंडांनी अल्पवयीन मुलींना भोगले. कुडा-मातीच्या टीचभर झोपडीत राहणाºया या मुलींना जंगल नवे नाही. इतरांना मदत करणे, सर्वांशी प्रामाणिक राहणे हा या समाजाचा मूळ स्वभाव आहे. तोच हेरून अगदी दहा रुपयांचे आमिष दाखवून मुलींच्या अब्रूचा खेळ केला. तर शिक्षणाचा अभाव असल्याने, पीडित मुलींनाही अनेक दिवस आपण बळी ठरल्याची जाणच नव्हती. घरातल्या मंडळींनीही सुरवातीला आरडाओरड करून नंतर ‘हे असे गरिबांसोबत घडतच असते’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतली.गेल्या २५-३० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पण १९९७ पासून प्रसिद्धी माध्यमांनी ‘कुमारी मातां’चा हा प्रश्न जगापुढे आणला. त्यानंतर मुंबई-पुण्याच्या नेत्यांपासून तर महिला आयोगाच्या पदाधिकाºयांनी दौरे केले. सरकारने आकडेवारी गोळा केली. महिला आयोगानेही सर्वेक्षण केले. शासन आजही येथे ४८ कुमारी माता असल्याचे सांगते, पण गावकºयांच्या मते हा आकडा शंभराहून अधिक आहे.कोणीबी याचं, नाव लिवाचं... द्याचं काईच नाईशासनाचे प्रतिनिधी, अधिकारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि जातात. आपल्यासाठी काहीच करीत नाही, या भावनेतून झरीवासी प्रतिसादही द्यायला तयार नाही. ‘कोणीबी याचं नाव लिवाचं. द्याचं काईच नाई. कोणी मन्ते पोराले धरून फोटो काढ. कोणी मन्ते घरासंग उभी राहून फोटो काढू दे...’ अशा शब्दात एका कुमारी मातेने आपला संताप सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केला.‘त्या’ कोवळ्या जीवांचे काय?कुमारीमातांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांचा गंभीर प्रश्न आहे. अल्पवयात प्रसुत झालेल्या या मातांना बाळांची काळजी कशी घ्यावी, हेही निट ठाऊक नसते. ज्यांची मुले कशीबशी मोठी झाली, त्यांच्या शिक्षणाचा मोठा पेच आहे. शाळेत नाव टाकायचे तर बापाचे नाव हवे असते, जातीचा दाखला हवा असतो. काही जणींनी आजोबाचे (स्वत:च्याच वडिलाचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. तर काही जणींनी बापाच्या ऐवजी स्वत:चेच (आईचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. पण शाळेत गेल्यावरही ‘तुझा बाप कोण’ हा प्रश्न या मुलांना जगणे नकोसे करतोच.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला