शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पुरग्रस्त विद्यार्थ्यांना ‘कृषी’च्या तिसऱ्या फेरीत मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 3:12 PM

दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल..

ठळक मुद्देराज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत

पुणे : अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेश फेरीत संधी दिली जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.राज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमधील बीएससी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या यांसह आठ पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कृषी परिषदेमार्फत राबविली जात आहे. राज्यात एकुण ११ हजार ७३० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत आहे. तर तिसरी फेरी दि. १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी तसेच सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची टांगती तलवार आहे. पण परिषदेने या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना कौसडीकर म्हणाले, महापुर तसेच अतिवृष्टीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी दुसºया फेरीची मुदत दि. १३ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. पण त्यानंतर या फेरीत निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता आलेला नाही. सांगली व कोल्हापुरमधील विद्यार्थी बाहेर जाऊ शकले नाहीत. तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी याभागात येऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी निवड होऊनही प्रवेश घेतले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसºया फेरीमध्ये संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या  फेरीत मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश द्यायचा की प्रक्रियेनुसार प्रवेश द्यावा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी दि. १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पीएचडीची दि. १० ऑगस्ट रोजी होणारी प्रवेश परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे कौसडीकर यांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीfloodपूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी