शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलनाध्यक्ष पत्र लिहून करणार कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:31 AM

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबई : अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असते. त्याद्वारे सशक्त वाचन संस्कृती निर्माण होते व अशाच देशात ज्ञानसत्ता निर्माण होत असते. त्यामुळे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची तसेच माहितीपर पुस्तके वाचावीत, असे आवाहन नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा आणि सर्व प्रकारच्या माध्यमातील विद्यार्थी पात्र ठरतील.गेले वर्षभर राज्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष उपक्रमासाठी आवाहन करीत आहेत. यामधून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांचे अवांतर वाचन वाढण्यास मदत होईल. तिसरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला याचे आयोजन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बालवयापासून वाचनाची आवड होती. वाचन व व्यासंगामुळे ते एवढे मोठे महामानव झाले व त्यांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यांनी वंदन करून वाचनाची आवड स्वत:ला लावून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे आणि अशा विद्यार्थ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी शाळांनाही केले आहे.‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार आणखी ५ पुस्तकेसर्वाधिक पुस्तके वाचणाºया १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष त्यांना आणखी प्रत्येकी ५ पुस्तके भेट देतील. वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी