शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मोदी जे पितात तेच ड्रिंक आदित्य ठाकरेंच्या पेल्यात; राऊतांनी पुन्हा मकाऊवरून टोले हाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:28 IST

या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. - संजय राऊत

काल मी एक ट्विट केले, त्याद्वारे एक फोटो प्रसिद्ध केला. मी त्यात कोणता पक्ष नेता, संघटना याचे नाव घेतले नाही. महाराष्ट्रातील जवाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ येथे जुगार खेळत होता, तिथे पिझ्झा खायला कोणी जात नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, असा टोला संजय राऊत य़ांनी लगावला आहे. 

काल रात्री मला कळाले की त्यांनी पोकर तिथे घेतले. ते काय असते हे मी समजून घेतले. साडे तीन कोटीचे पोकर घेतले त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात कुटुंब कुठेही दिसत नाही. लंडनला आमदाराचे शिष्टमंडळ गेले, आमदारांना वाटलं अशाप्रकारच्या जागेचा अभ्यास करावा, असा टोला राऊतांनी भाजपा आणि बानवकुळेंना लगावला. 

आदित्य ठाकरे जे पीत आहेत ते डाएट कोक आहे. मोदी जे पितात तेच कोक आदित्य ठाकरे पितात. ईडी सीबीआय पोलीस असताना भाजप इतका का घाबरला? असा सवाल राऊतांनी केला. याचबरोबर आम्ही मानसिक रुग्ण आहोत. आपल्या सारख्या व्यक्तीपासून महाराष्ट्र वाचवायचा ही आमची मानसिकता आहे. दंगल घडवण्याची मानसिकता यांची आहे. लोकांना नैतिकतेच्या गोष्टी करणारी ही भारतीय जुगार पार्टी आहे. भाजप भ्रष्ट पार्टी आहे. निवडणूक अधिकारी, विधानभवन राष्ट्रपती हे काही करणार नाहीत. हे भाजपचे पोपट आहेत. यांच्या पाठीचा कणा मोडलाय. हे वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात, असा आरोप राऊत यांनी केला. 

विधानसभा अध्यक्ष स्वत: वकील आहेत. त्यांना योग्य अयोग्य कळत नाही का? घटनाबाह्य सरकारला पाठींबा देत आहेत. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. पंतप्रधान मोदी सांगतात पवारांनी  ७० हजार कोटीचा घोटाळा केला,पण त्या पवारांना मोदी मांडीवर घेऊन बसलेत. यावरून दिसते कोण मनोरुग्ण आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असे फडणवीस यांचे झाल्याचा टोला राऊतांनी हाणला. 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई साफ करावी, नाहीतर लवकरच महाराष्ट्राची जनता त्यांना साफ करेल. कलानगर येथून सुरूवात केलीय, कारण कलानगरवर त्याचे प्रेम आहे. सर्व काही कलानगरनेच दिलेय त्यांना, हे ज्या खुर्चीवर बसलेत तेही कलानगरचीच बदोलत. मुंबईसह महाराष्ट्र ज्या अदानीच्या घशात घालू इच्छितात त्याला आम्ही विरोध करतोय. धारावी तसेच मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAditya Thackreyआदित्य ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा