शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 16:06 IST

जालन्यातील लाठीचार्ज घटनाचा निषेध करत शिंदे-फडणवीसांचा घेतला समाचार

Aditya Thackeray on Jalna Police Lathi Charge - Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी राज्यभर तीव्र असंतोष दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने, निषेधाचे मोर्चे, बंद, रास्ता रोको असे विविध प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून या घटनेतील जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत. तसेच अपर पोलिस अधीक्षक राहूल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेत टीका केली आहे.

तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर...

"ही केवळ आरोप-प्रत्यारोपाची गोष्ट नाही. पोलिसांनी त्या ठिकाणी जमावावर, आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. हा घडलेला प्रकार आणि त्याच्या बातम्या साऱ्यांनी टीव्हीवर पाहिल्या आहेत. अतिशय भयानक असा लाठीचार्ज करण्यात आला. जणू काही आपल्या शत्रूवरच हल्ला केला जात आहे, अशा प्रकारचा लाठीचार्ज करायला लावला. मी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि एकंदर कार्यक्रम गेली दोन-अडीच वर्षे जवळून पाहिलं आहे. जेव्हा अशा संवेदनशील विषयात आंदोलन होत असतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना माहिती न देता कोणीही लाठीचार्ज करू शकत नाही. १०० टक्के याबद्दल सरकारला माहिती होती. म्हणूनच आज या खोके सरकारने राजीनामा देण्याची गरज आहे. त्यांना लाज असेल तर ते राजीनामा देतील," असे अतिशय रोखठोक मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय मंडळीच नव्हे तर मराठी कलाकारही बोलते झाले आहेत. मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करत जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. त्याने लिहिले आहे, "जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी… राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!"

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे आंदोलन आणि उपोषण करत असलेल्या आंदोलकांना शुक्रवार १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. हा लाठीमार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याच आदेशावरून झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. तसेच या प्रकरणी कागवाईची मागणीही होत होती. अखेर आज तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाAditya Thackreyआदित्य ठाकरेmarathaमराठाreservationआरक्षणagitationआंदोलनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस