शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 6:56 PM

स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई - घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ऊठसूठ सर्वांना आश्वासने दिली. परंतु एकही काम झाले नाही. वेदांतासारखा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितले गेले. पण अजून काहीही झाले नाही. महाराष्ट्र सरकारने जे इकोनॉमी कौन्सिल बनवलं आहे त्याचे अध्यक्षच गुजरातला जाऊन ७० हजार कोटींची गुंतवणूक करतात. मग तुमच्या हातात काय राहिले?. गुजरातच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतला गेला नाही. स्वखर्चात परदेश दौरा करणाऱ्यांची नावे जाहीर करा. निर्लज्जपणा बाजूला ठेवा आणि महाराष्ट्राला जी काही उत्तरे द्यायला हवीत ती द्या अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ५० लोक सोबत होते. पण माझ्या टीकेनंतर ५-६ लोक कमी केले. त्यानंतर ४० जणांना दावोसला नेले. या दौऱ्याला २० कोटीहून अधिक खर्च दाखवू नका असं सांगितले. हा पैसा सामान्य लोकांच्या करातून जात आहे. जे उद्योगपती मुंबईत भेटायला हवे होते तेच दावोसला भेटले. दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी कामशून्य केले. मविआ सरकार असताना मी साधा मंत्री म्हणून दावोसला गेलो होतो. तेव्हा वर्ल्ड इकोनॉमी फोरमचं काँग्रेस सेंटर तिथे मला ३ ठिकाणी बोलायला संधी मिळाली. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये बोलल्याचे एकही फोटो नाही. ४० गुंडाची टोळी नेली. परंतु मित्र पक्षाच्या खात्यामधील कुणालाही नेले नाही असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मागील वर्षी जे करार केले त्याचे पुढे काहीच होत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचे होते. जेवढा खर्च मुख्यमंत्र्यांनी दावोसला केला तितका खर्च त्यांनी त्यांच्या गावात जिथं २ हेलिपॅड उभारले आहेत. तिथे या सर्वांना घेऊन आला तर महाराष्ट्राचा काही फायदा झाला असता. पण दुर्दैवाने एकाबाजूला व्हायब्रेंट गुजरात झाले. तिथे २६ लाख कोटी रुपयांचे MOU झाले. तामिळनाडू सरकारनेही हिंमत करून समिट घडवून आणले. तिथे सहा लाख कोटींची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात घेऊन गेले. पण महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र गेल्या २ वर्षापासून झाले नाही. स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, राजन साळवी, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्यामागे तपास यंत्रणा लागली आहे. तरीही हे नेते लढतायेत. काहीही झाले तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही ते आमच्यासोबत आहेत. लपवण्यासारखे ज्यांच्याकडे आहे ते भाजपा-शिंदे गटात जातात. सत्य बोलणाऱ्यांना नोटीस दिली जाते. ईडी, सीबीआयकडून आमच्या नेत्यांवर सातत्याने दबाव टाकला जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा