शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

By अतुल कुलकर्णी | Updated: December 23, 2017 04:08 IST

टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

मुंबई : टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असताना, हा निर्णय आल्यामुळे चव्हाण यांचे पद अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौºयावर घेऊन जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही अचानक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्टÑवादीबाबत भाषा बदलत, यापुढे एकत्रित निवडणुका लढविल्या पाहिजेत, असा सूर आळविला आहे.२०१४च्या निवडणुकीत महाराष्टÑात भाजपाला जरी १२२ जागा मिळाल्या, तरी त्यांच्या मतांची टक्केवारी २७.८१ होती. त्याउलट दोन्ही काँग्रेसची एकत्रित टक्केवारी ३५.१९ एवढी होती.आता शिवसेनाही भाजपाच्या विरोधात असून, त्यांच्या मतांची टक्केवारी १९.३५ होती. याचा अर्थच भाजपाच्या विरोधात ५४.५४ टक्के मते होती, हे विसरून चालणार नाही, असे चव्हाण यांचे मत आहे.आज राज्यात कर्जमाफी, शेतकºयांच्या वीजबिलावरून सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरातचा निकाल, टू जी घोटाळ्यातून काँग्रेसची मुक्तता, अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा, राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना अशोक चव्हाणांची बाजू घेत दिलेल्या प्रतिक्रिया, यामुळे दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी होत चालल्याचे दिसून येते.मात्र, भाजपाच्या नेत्यांची मते वेगळी आहेत. जरी अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला, तरी आदर्शमध्ये त्यांनी आणि ज्या कोणी अधिकाराचा वापर करत, तेथे फ्लॅट घेतले, त्या आरोपातून त्यांची सुटका झालेली नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.आमचेही राजकीय डावपेच कमी पडत आहेत, असे सांगून, तो नेता म्हणाला, काँग्रेस, राष्टÑवादीचा ज्या दिवशी नागपुरात मोर्चा निघाला, त्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्याने, भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असा संदेश आमच्या विरोधात गेला. तो आम्ही टाळू शकलो असतो, असेही तो नेता म्हणाला.बाळासाहेबांच्या चित्रपटाची तारीख सूचक-बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट २३ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले़ लोकसभा निवडणुका मे, जून २०१९ मध्ये होणे अपेक्षित आहे़ विधानसभा निवडणुका त्याच वेळी घेण्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी घाटले आहे़ त्यामुळे चित्रपटाची तारीख सूचक आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस