शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

By अतुल कुलकर्णी | Updated: December 23, 2017 04:08 IST

टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

मुंबई : टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असताना, हा निर्णय आल्यामुळे चव्हाण यांचे पद अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौºयावर घेऊन जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही अचानक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्टÑवादीबाबत भाषा बदलत, यापुढे एकत्रित निवडणुका लढविल्या पाहिजेत, असा सूर आळविला आहे.२०१४च्या निवडणुकीत महाराष्टÑात भाजपाला जरी १२२ जागा मिळाल्या, तरी त्यांच्या मतांची टक्केवारी २७.८१ होती. त्याउलट दोन्ही काँग्रेसची एकत्रित टक्केवारी ३५.१९ एवढी होती.आता शिवसेनाही भाजपाच्या विरोधात असून, त्यांच्या मतांची टक्केवारी १९.३५ होती. याचा अर्थच भाजपाच्या विरोधात ५४.५४ टक्के मते होती, हे विसरून चालणार नाही, असे चव्हाण यांचे मत आहे.आज राज्यात कर्जमाफी, शेतकºयांच्या वीजबिलावरून सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरातचा निकाल, टू जी घोटाळ्यातून काँग्रेसची मुक्तता, अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा, राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना अशोक चव्हाणांची बाजू घेत दिलेल्या प्रतिक्रिया, यामुळे दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी होत चालल्याचे दिसून येते.मात्र, भाजपाच्या नेत्यांची मते वेगळी आहेत. जरी अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला, तरी आदर्शमध्ये त्यांनी आणि ज्या कोणी अधिकाराचा वापर करत, तेथे फ्लॅट घेतले, त्या आरोपातून त्यांची सुटका झालेली नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.आमचेही राजकीय डावपेच कमी पडत आहेत, असे सांगून, तो नेता म्हणाला, काँग्रेस, राष्टÑवादीचा ज्या दिवशी नागपुरात मोर्चा निघाला, त्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्याने, भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असा संदेश आमच्या विरोधात गेला. तो आम्ही टाळू शकलो असतो, असेही तो नेता म्हणाला.बाळासाहेबांच्या चित्रपटाची तारीख सूचक-बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट २३ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले़ लोकसभा निवडणुका मे, जून २०१९ मध्ये होणे अपेक्षित आहे़ विधानसभा निवडणुका त्याच वेळी घेण्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी घाटले आहे़ त्यामुळे चित्रपटाची तारीख सूचक आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस