शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

By अतुल कुलकर्णी | Updated: December 23, 2017 04:08 IST

टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

मुंबई : टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असताना, हा निर्णय आल्यामुळे चव्हाण यांचे पद अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौºयावर घेऊन जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही अचानक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्टÑवादीबाबत भाषा बदलत, यापुढे एकत्रित निवडणुका लढविल्या पाहिजेत, असा सूर आळविला आहे.२०१४च्या निवडणुकीत महाराष्टÑात भाजपाला जरी १२२ जागा मिळाल्या, तरी त्यांच्या मतांची टक्केवारी २७.८१ होती. त्याउलट दोन्ही काँग्रेसची एकत्रित टक्केवारी ३५.१९ एवढी होती.आता शिवसेनाही भाजपाच्या विरोधात असून, त्यांच्या मतांची टक्केवारी १९.३५ होती. याचा अर्थच भाजपाच्या विरोधात ५४.५४ टक्के मते होती, हे विसरून चालणार नाही, असे चव्हाण यांचे मत आहे.आज राज्यात कर्जमाफी, शेतकºयांच्या वीजबिलावरून सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरातचा निकाल, टू जी घोटाळ्यातून काँग्रेसची मुक्तता, अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा, राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना अशोक चव्हाणांची बाजू घेत दिलेल्या प्रतिक्रिया, यामुळे दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी होत चालल्याचे दिसून येते.मात्र, भाजपाच्या नेत्यांची मते वेगळी आहेत. जरी अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला, तरी आदर्शमध्ये त्यांनी आणि ज्या कोणी अधिकाराचा वापर करत, तेथे फ्लॅट घेतले, त्या आरोपातून त्यांची सुटका झालेली नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.आमचेही राजकीय डावपेच कमी पडत आहेत, असे सांगून, तो नेता म्हणाला, काँग्रेस, राष्टÑवादीचा ज्या दिवशी नागपुरात मोर्चा निघाला, त्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्याने, भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असा संदेश आमच्या विरोधात गेला. तो आम्ही टाळू शकलो असतो, असेही तो नेता म्हणाला.बाळासाहेबांच्या चित्रपटाची तारीख सूचक-बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट २३ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले़ लोकसभा निवडणुका मे, जून २०१९ मध्ये होणे अपेक्षित आहे़ विधानसभा निवडणुका त्याच वेळी घेण्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी घाटले आहे़ त्यामुळे चित्रपटाची तारीख सूचक आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस