शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:18 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून भाजपा-शिवसेनेत चांगलीत जुंपली असून रामदास कदम यांना रवींद्र चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाच्या २ ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला तर रामदास कदम हे अडाणी, त्यांनी १५ वर्षात काय केले असा परखड सवाल करत चव्हाणांनी पलटवार केला आहे.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचं काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवलं आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली. 

तर कोकणातील जनता आम्हाला सवाल विचारते, आम्हालाही सहन करण्याची मर्यादा आहे. युतीत असतानाही आम्ही हे बोलतोय. घरचा आहेर दिला पण आम्हाला नाईलाज आहे. पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत अतिशय चांगले काम करतायेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम उदय सामंत करतायेत. कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही. दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतूने काम करतायेत. आमदार योगेश कदम यांना बदनाम करण्याचं काम करतायेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. हे थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असंही रामदास कदमांनी म्हटलं.

तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही...

दरम्यान, बोलायला मला सुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या. कशा भाषेत मला बोलता येते कुणी वाचवायला राहणार नाही. लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे. मी उत्तर देईन. युती धर्म पाळतोय याचा अर्थ कुणी काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ असं नाही. तोंड सांभाळून बोलायचे, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदम अडाणी माणूस. राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नितीन गडकरींच्या अख्यातरित्य येतो. टाळ्या वाजवणारेही अडाणी असावेत. १५ वर्ष स्वत: मंत्री होते. ३० वर्ष शिवसेनेत नेते होते काय केले असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिले आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४