शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:18 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून भाजपा-शिवसेनेत चांगलीत जुंपली असून रामदास कदम यांना रवींद्र चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाच्या २ ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला तर रामदास कदम हे अडाणी, त्यांनी १५ वर्षात काय केले असा परखड सवाल करत चव्हाणांनी पलटवार केला आहे.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचं काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवलं आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली. 

तर कोकणातील जनता आम्हाला सवाल विचारते, आम्हालाही सहन करण्याची मर्यादा आहे. युतीत असतानाही आम्ही हे बोलतोय. घरचा आहेर दिला पण आम्हाला नाईलाज आहे. पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत अतिशय चांगले काम करतायेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम उदय सामंत करतायेत. कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही. दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतूने काम करतायेत. आमदार योगेश कदम यांना बदनाम करण्याचं काम करतायेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. हे थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असंही रामदास कदमांनी म्हटलं.

तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही...

दरम्यान, बोलायला मला सुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या. कशा भाषेत मला बोलता येते कुणी वाचवायला राहणार नाही. लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे. मी उत्तर देईन. युती धर्म पाळतोय याचा अर्थ कुणी काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ असं नाही. तोंड सांभाळून बोलायचे, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदम अडाणी माणूस. राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नितीन गडकरींच्या अख्यातरित्य येतो. टाळ्या वाजवणारेही अडाणी असावेत. १५ वर्ष स्वत: मंत्री होते. ३० वर्ष शिवसेनेत नेते होते काय केले असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिले आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४