शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:54 IST

समाजवादी पक्षाच्या जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली.

Samajwadi Party on MVA : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ उलटल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र असे असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा काही जागांवर प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आता या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या समाजवादी पक्षाच्या विरोधातही काँग्रेस आणि ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीत अनेक जागांवरुन घटक पक्षांमध्ये वाद निर्माण झाले होते. अनेक चर्चांनंतरही बऱ्याच जागांचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे घटक पक्षांनी आपले उमेदवार त्या त्या मतदारसंघात उभे केले आहेत. अशातच महाविकास आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाच्या विरोधातही मित्र पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. या सगळ्यावर अबू आझमी यांनी भाष्य केलं.

"आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत. आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यामुळे आम्ही देखील तोच पर्याय स्विकारला आहे. भिवंडीतून आमचे दोन आमदार निवडून आले तर हा एक चमत्कार असेल. आम्हाला नाशिकप्रमाणेच भिवंडी सुधारायची आहे. आम्हाला भिवंडीचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्हाला तिथल्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत. आमची जनतेला विनंती आहे की आम्हाला विजयी करा," असं अबू आझमी म्हणाले.

"मी महाविकास आघाडीकडे २५ जागांची मागणी केली होती. पण आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले की जर आपण २५ जागा लढवल्या तर मते विभागली जातील आणि भाजप जिकेंल. त्यांनी असे करु नका सांगितले. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार आहोत. पण आम्ही अशा ठिकाणी निवडणूक लढवत आहोत जेथून जिंकू शकू," असेही अबू आझमी म्हणाले.

महाराष्ट्रात सपाने निवडणूक लढवण्यासाठी १२ मुस्लिमबहुल जागा निश्चित केल्या होत्या. मात्र, नंतर सपाने पाच जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले. यातील मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या जागांवर गेल्या निवडणुकीत सपाने विजय मिळवला होता. त्यामुळे  अबू आझमी यांनी धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य जागा मागितल्या होत्या. मात्र अबू आझमी यांनी मागितलेल्या पाचपैकी तीन जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने रोजी त्यांचे उमेदवार जाहीर केले.

दुसरीकडे, मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे गटाचे राजेंद्र वाघमारे यांनी ठाकरे गट आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता अबू आझमी यांच्यासमोर  नवाब मलिक, सुरेश पाटील, राजेंद्र वाघमारे अशा सर्वच पक्षांचे आव्हान असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे