शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'आप अन् काँग्रेस'नेच दिल्लीच्या दंगली भडकावल्या, आठवलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:28 IST

केंद्रीयमंत्री आणि भाजपाच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र दिल्लीतील दंगलीला काँग्रेस

मुंबई - दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस आणि आप हे दोन पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते, तर ही दंगल थांबवू शकले असते, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात केला. दिल्ली हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने या हिंसाचारास मोदी सरकारला जबाबदार धरलं असून गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला आहे.  

केंद्रीयमंत्री आणि भाजपाच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र दिल्लीतील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलंय. दिल्ली दंगल आधी आपच्या नगरसेवकाने भडकवली. त्यानंतर काँग्रेसने ती आणखी भडकवली, असेही आठवलेंनी म्हटले. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती झाल्यानंतर आठवलेंनी खासदार संजय राऊत यांनाही चिमटा काढला. ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यांच्यावरच पक्षाने अन्याय केला. किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे म्हणत आठवलेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला.राज ठाकरे यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असा दावाही आठवले यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला. 

दरम्यान, दिल्लीतील दंगलींना आळा घालण्यात घोर अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर काँग्रेस ठाम असून, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पक्ष हा विषय संसदेत नेटाने लावून धरील, असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी सांगितले.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेdelhi violenceदिल्लीAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा