शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:03 IST

Aaditya Thackeray News: देशात लोकशाही संपत चालली आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत सगळे एकत्र असून, गद्दारांना लोकांनी नाकारले आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray News: आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत. जनता आमच्यासोबत आहे. या देशात लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र येऊन जे लोक संविधान संपवू पाहत आहेत, त्यांच्या विरोधात लढत आहोत. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे, ते आमच्यासोबत राहतील, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाकडून स्टार प्रचारक आहेत. आदित्य ठाकरेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सभा, बैठका यांवर भर दिला जात आहे. यातच प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा तसेच महायुतीवर जोरदार टीका केली. यवतमाळमध्ये फॉर्म भरला जात आहे, तिथे जात आहे. या ठिकाणी सभा आहे, प्रचार सुरू होत आहे. एनडीएकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. एनडीए कोणता भ्रष्ट उमेदवार देणार हे पाहावे लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात

जगातील अनेक देशांमध्ये एप्रिल फूल डे साजरा केला जातो. मात्र, हा दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. तसेच आता देशाचे भविष्य दिसत आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसापूर्वी जे यांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी गद्दारी केली. आता कोण लोक कोणत्या पक्षात आहे. सगळ्यांना माहिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

जिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारले आहे

बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरक असतो. आता चित्र स्पष्ट झाले आहे. जिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारले आहे. गेल्या १० वर्षात भाजपाने केंद्रात आणि राज्यात जी कामे करायला पाहिजे होती, ती केली नाही. सरकारने जी आश्वासन दिली होती, ती अपूर्ण आहेत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र आहेत, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले.

दरम्यान, शिवसेना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीविरोधात लढत होते. आता काय झाले. काही महिन्यांपूर्वी काही लोक काय काय बोलत होते. आता मात्र जनतेसमोर चित्र स्पष्ट आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी महायुतीतील शिंदे गटावर टीका केली.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४