शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली का? जुनी पेन्शन योजना लागू झाली का?”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:09 IST

Aaditya Thackeray: लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे सुरू झाले आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली.

Aaditya Thackeray: विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीकडून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीड, परभणी प्रकरणावरूनही विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच शेतकरी कर्जमुक्ती, जुनी पेन्शन योजना, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये यांवरूनही विरोधक सातत्याने महायुती सरकारला सवाल करत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून टीका केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का ? आठवा वेतन लागू करणार आहात का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच त्यांना पालकमंत्री नाही, मालकमंत्री व्हायचे आहे. दादागिरीला मुख्यमंत्री झुकत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंची टीका

लाडकी बहीण योजनेवरून विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महिना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. हे २१०० रुपये कधीपासून देणार, असा सवालही सातत्याने केला जात आहे. याबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना मोठा दावा केला आहे. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे सुरू झाले आहे का? लाडकी बहीण योजनेवर माझा अंदाज असा आहे की, अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत. किंबहुना  ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत,  ते महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करून टाकतील, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

दरम्यान, उदय सामंत यांच्या दाव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजपा आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार फोडायच्या विचारात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना