शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 19:17 IST

"पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत."

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या काही दिवसांपासून शांतते उपोषण करत असलेले मोज जरांगे आज अचानक आक्रमक झाले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. "आपल्याला बदनाम करायचे, आपल्याला सलाइनमधून विष द्यायचे अथवा आपले एन्काउंटर करायचे, देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न आहे, असे देवेंद्र फडणवीसांना वाटते." एवढेच नाही तर, काही लोकांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. संपवण्याचे कटकारस्थान होत आहे. यामुळे मी आता मुंबईतील सागर बंगल्यावर येतो', असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या संपूर्ण प्रकारावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. 

...या अँगलनेही तपास होणे आवश्यक -यासंदर्भात बोलताना, "शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला थांबवण्याचे, अशांत करण्याचे काम चालवले आहे. या सर्व बाबींसंदर्भात माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, निर्देश आहेत, निरीक्षणं आहेत. हे असताना, पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत. या मागे संपूर्ण राजकीय हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचे राजकारण असेल, या अँगलनेही तपास होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र डिस्टर्ब होऊ नये, हे महत्वाचे आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे," असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

जरांगेंनी नौटंकी बंद करावी -मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर तुमची खेळलेली खेळी संपली, हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून लक्षात येते. समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करुन ढेकरु द्यायचं बंद करा, समाजाला माहिती पडलंय, समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलेय, समाज खूश आहे. तुमच्या आयडिया आणि अॅडव्हाईसची समाजाला गरज नाही, असे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना उद्देशून म्हटले. तसेच, त्यांनी नौटंकी बंद करावी, असेही लाड यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले भुजबळ? -"मराठा समाजाला विधानमंडळात एकमाताने स्वतंत्र्य आरक्षण दिले आहे. सर्व आमदारांनी आणि सर्व पक्षांनी ते एकमताने केले आहे. तसेच सर्व विरोध पक्षांचे नेते, मग ते काँग्रेसचे असतील, पवार साहेब असतील, शिवसेनेचे असतील किंवा महायुतीचे असतील, त्यांनी हेच सांगितले होते, की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचे काम करा. त्याप्रमाणे ते झाले. यानंतर जरांगेंनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे?" असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

भुजबळ म्हणाले, "आता त्याचेच लोक त्याच्य विरोधात आरोप करायला लागले आहेत. त्यामुळेच कदाचित त्रस्त होऊन हे अकांडतांडव त्यांनी सुरू केलेले असेल, असे मला वाटते. कारण, आता त्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे. त्यात त्यांनी केलेल्या गुप्त बैटका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाची त्यांनी जी दिशाभूल केली आहे, हे सर्व आता त्यांचेच लोक बोलायला लागले आहेत. यामुळे कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल, त्यामुळेच ते आता काही तरी बोलत आहेत."

एवढेच नाही तर, "माझे त्यांना म्हणणे आहे की, तुम्ही आधी तब्बेत सांभाळा. मला मोठं आश्चर्य वाटतं की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज मात्र फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांनाही ऐकत नव्हते, एवढी शक्ती त्यांना उपोषण कर्त्याला कशी काय आली? हेही वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं आश्चर्य आहे," असा उपरोधिक टोलाही भुजबळ यांनी यावेळी जरांगेंना लगावला.    

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारण