शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Jitendra Awhad "कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:44 IST

Shivaji Maharaj Statue collapsed in malvan: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज मालवणमध्ये घडली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, आव्हांनीही टीकेची तोफ डागली.

Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत असून, महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. या घटनेनंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या कामाचे वाभाडेच काढले आहेत. 

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. ३५ फुटांच्या या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाकडून पुतळा उभारण्याचे काम करण्यात आले होते. पण, तो पुतळा पडल्याने आता कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.  

जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराज आम्हाला माफ करा'

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुतळा कोसळल्यानंतरचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. आव्हाडांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे", असे टीकास्त्र आव्हाडांनी डागले आहे.  

आव्हाड पुढे म्हणतात, "महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय? हा पुतळा उभा आणि हातात म्यानातून उपसलेसी तलवार असलेलाच का आहे? कुणालाच या पुतळ्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही का? हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते. आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा", असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

विरोधकांकडून महायुती सरकार लक्ष्य

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. विरोधकांकडून वेगवेगळे प्रश्न पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात उपस्थित केले जात आहे. कंत्राटदाराचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला असून, मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून घाई केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुती