शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 5:33 AM

अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत 

बीड : गायरानातील अतिक्रमण कायम करावे व त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी मंजुरी द्यावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या अप्पाराव भुजंग पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आंदोलनस्थळी रविवारी पहाटे मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर ४० तासांनंतरही (सायं. ५ वाजेपर्यंत) अंत्यसंस्कार झालेले नव्हते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येेथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत. त्यांनी तेथील अतिक्रमण कायम करावे, अशी मागणी केली होती. या मागणीसाठी ३ डिसेंबरपासून पवार दाम्पत्य व इतर नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ४ डिसेंबरला पहाटे अप्पाराव पवार यांची प्राणज्योत मालवली.