शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:34 IST

Maharashtra News: गायीला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य.

Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनात शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गायीला 'राज्यमाता' घोषित केले आहे. या ऐतिहासिक पाऊलाबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारने सांगितल्यानुसार, वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गाईचे स्थान, मानवी आहारात गाईच्या दुधाची उपयुक्तता, आयुर्वेद औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण व गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अशाप्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र दुसरे राज्य बनले आहे.

दरम्यान, सनातन धर्मात गायीला माता मानले जाते. तसेच या धर्मात गायीची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार गाईंमध्ये देवदेवता वास करतात. गेल्या काही काळापासून अनेक हिंदू संघटनांकडून गायीला राज्याच्या मातेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हा सर्व विचार करुन आता सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.

 

गायीला राजमाता घोषित करणारे उत्तराखंड हे पहिले राज्यगायीला "राजमाता" किंवा "राष्ट्रमाता" म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. आता महाराष्ट्राच्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे.

भारतात गायीचे महत्त्वभारतात अनेक प्राणी आणि पक्ष्यांची पूजा केली जाते आणि त्यांना हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाचा संबंध गायीशी आहे. गाईला पवित्र मानण्यासोबतच दूध, मूत्र आणि शेणही पवित्र मानले जाते. गाईचे दूध मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, तर गोमूत्रामुळे अनेक आजार बरे होतात असा दावा केला जातो. याशिवाय आयुर्वेदात असे सांगितले आहे की, मुलांना गायीचे दूध पाजल्याने त्यांचा विकास होतो आणि मुलांचा स्वभाव शांत राहतो. याशिवाय हिंदू धर्मात गायीला देवी-देवतांच्या समतुल्य मानले जाते. 

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची टीम 28 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर महाराष्ट्रात पोहोचली होती. दोन दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाच्या पथकाने अनेक राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने 26 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्या लागतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारcowगाय