शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:34 IST

Maharashtra News: गायीला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य.

Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनात शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गायीला 'राज्यमाता' घोषित केले आहे. या ऐतिहासिक पाऊलाबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारने सांगितल्यानुसार, वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गाईचे स्थान, मानवी आहारात गाईच्या दुधाची उपयुक्तता, आयुर्वेद औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण व गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अशाप्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र दुसरे राज्य बनले आहे.

दरम्यान, सनातन धर्मात गायीला माता मानले जाते. तसेच या धर्मात गायीची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार गाईंमध्ये देवदेवता वास करतात. गेल्या काही काळापासून अनेक हिंदू संघटनांकडून गायीला राज्याच्या मातेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हा सर्व विचार करुन आता सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.

 

गायीला राजमाता घोषित करणारे उत्तराखंड हे पहिले राज्यगायीला "राजमाता" किंवा "राष्ट्रमाता" म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. आता महाराष्ट्राच्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे.

भारतात गायीचे महत्त्वभारतात अनेक प्राणी आणि पक्ष्यांची पूजा केली जाते आणि त्यांना हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाचा संबंध गायीशी आहे. गाईला पवित्र मानण्यासोबतच दूध, मूत्र आणि शेणही पवित्र मानले जाते. गाईचे दूध मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, तर गोमूत्रामुळे अनेक आजार बरे होतात असा दावा केला जातो. याशिवाय आयुर्वेदात असे सांगितले आहे की, मुलांना गायीचे दूध पाजल्याने त्यांचा विकास होतो आणि मुलांचा स्वभाव शांत राहतो. याशिवाय हिंदू धर्मात गायीला देवी-देवतांच्या समतुल्य मानले जाते. 

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची टीम 28 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर महाराष्ट्रात पोहोचली होती. दोन दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाच्या पथकाने अनेक राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने 26 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्या लागतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारcowगाय