शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस; जलाशयांमध्ये मात्र ६६ टक्केच साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:18 IST

राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली.

मुंबई : राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली.११ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ७८.३ टक्के पाऊस झाला होता. सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला. तर, सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३.०७ टक्के उपलब्ध आहे.मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेंशन’मुंबईत श्रावण सरी बरसल्यानंतर विश्रांती घेणाऱ्या पावसाने तलाव परिसरातील हजेरी कायम ठेवली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा जमा झाला आहे. परिणामी, मुंबईकरांना पाण्यासाठी पुढील वर्षभर वणवण करावी लागणार नाही.१ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये किती जलसाठा आहे, यावर वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे गणित अवलंबून असते. आजच्या तारखेला तलाव क्षेत्रात १३ लाख ९३ हजार ८२६ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा मुंबईकरांना पुढील ३६६ दिवस पुरेल इतका आहे. पावसाचा हा शेवटचा महिना असल्याने तलावातील जलसाठा आणखी वाढणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Rainपाऊस