शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

एकतर्फी बदलीतील ८५ शिक्षकांची धाकधूक!

By admin | Updated: March 3, 2017 01:21 IST

कारवाईबाबत प्रशासनाचा कायमचा गोंधळ

अकोला, दि.२ : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या भरतीसोबतच आंतरजिल्हा बदलीचाही मोठा घोटाळा झालेला आहे. त्यातही एकतर्फी बदलीने रुजू झालेल्यांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, या मुद्यांवर शिक्षण विभागाचा गेल्या अनेक महिन्यांपासून गोंधळ आहे. त्या शिक्षकांची मात्र, धाकधूक सुरूच आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक चमत्कारांचा कळस झालेला आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत अनेकांची धाकधूक सुरू असते. त्या विभागात रुजू होण्यास काही ‘निष्णात’ कर्मचारी वगळता कुणीही तयार नाही. या परिस्थितीत एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ८५ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा कोणता पर्याय वापरला जातो, यावरच त्यांचे नोकरीतील ठिकाण ठरणार आहे. जिल्हा परिषदेत एकतर्फी बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये सर्वच प्रवर्गातील शिक्षकांचा समावेश आहे. एकतर्फी बदलीने आलेले शिक्षकप्रतिभा पुंडे, छाया खानंदे, प्रकाश अंभोरे, पार्वती सनगाळे, सुुरेखा बिजवे, गजानन खेडेकर, अभय पजई, श्याम मानकर, सुभाष जाधव, राहुल तिडके, महेश माहुलकर, मिलिंद अडगोकर, किशोर मेश्राम, अतुल पाथरकर, श्याम तांबडे, विजया गावंडे, प्रशांत सरोदे, रुपाली देशमुख, रुपेश राठोड, अविनाश कडू, छाया राऊत, देवीदास साळुंके, ज्योती गाडगे, विजयसिंग चव्हाण, सारिका राखोंडे, अर्चना पोहरकर, स्वप्नाली पाटील, रेणुका बाबर, अमित चव्हाण, राजू ठाकरे, गजानन लोखंडे, सुभाष खुळे, दिनेश ठाकरे, गजानन करवते, रघुनाथ पांडे, शुभांगी वाघमारे, नितीन श्रीनाथ, संजय पवार, जया वाघोळे, वर्षा गोपनारायण, प्रशांत इंगळे, राजेश इंगळे, नितीन उकर्डे, मंदा चव्हाण, चंदा पवार, मनीषा सर्वज्ञ, राजेश तायडे, अर्चना खाडे, अश्विनी बोंडे, सीमा सरोदे, आर.डी. ढोले, संतोष लोेणे, विजया राऊत, अनंत नाहाटे, अजय मावदे, मनोज दुधे, प्रदीप मंगळे, आशा मालवे, रुपाली साबळे, विठ्ठल वानखडे, वासुदेव चिपडे, संजय एकीरे, जयश्री राऊत, सरोज दातीर, सीमा हिरोळे, राजेश मुकुंदे, प्रदीप नवलकार, मनीषा वानखडे, सीमा राऊत, पांडुरंग डाबेराव, उज्ज्वला अढाव, दीपाली वानखडे, गजानन कराळे, अनंतकुमार तायडे, ओमप्रकाश उगले, राजेंद्र दिवनाले, प्रदीप जाधव, नितीन भागवत, दिनेश महल्ले, देवेंद्र फोकमारे, विद्या मढे, दीपाली भुईकर, किरण पाटील, धर्मेद्रसिंग चव्हाण, विजया खंडारे. कारवाईचे स्वरूप लवकरच ठरणार!एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बिंदू नामावली मंजूर नसताना रुजू झाले आहेत. आधीच शिक्षक अतिरिक्त असतानाही त्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. त्या सर्व प्रकरणात तत्कालिन वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीही दोषी आहेत. त्यामुळे त्या सर्वांवरही कारवाई झाल्यासच या प्रकरणाची तड लागणार आहे.