शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
2
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
3
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
4
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
5
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
6
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
7
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
8
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
9
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
10
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
11
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
12
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
13
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
14
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
15
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
16
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
17
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
18
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
19
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
20
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:09 AM

भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

भंडारा /गडचिरोली : मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका भंडारा जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.तर गडचिरोली जिल्ह्यात जलमय झालेल्या परिसरात पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे व रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेले आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावून वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पिकांनाही बसला आहे. पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत.पूरग्रस्तांना तातडीने मदत करा - फडणवीसनागपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ६१ गावांना गत आठवड्यात पुराचा फटका बसला. पेंच आणि कन्हान नदीला पूर आल्याने २२ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्तांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. 

टॅग्स :floodपूरVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र