शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राज्यात कोरोनाचे ८० हजार २२९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:26 IST

दिवसभरात वाढले २,४३६ रुग्ण, तर मृतांचा आकडा १३९वर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ हजार ४३६ रुग्णांची नोंदहोऊन बाधीत रुग्णांची एकूण संख्या ८० हजार २२९ एवढी झाली आहे. १३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २ हजार ८४९ झाला आहे.

शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार१५६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.८१ टक्के झाले असून मृत्यूदर सातत्याने कमी होत३.५५ टक्क्यांवर आला आहे. दिवसभरातील १३९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५४, ठाणे ३०, वसई-विरार १, कल्याण-डोंबिवली ७, भिवंडी १, जळगाव १४, नाशिक २, मालेगाव ८, पुणे १४, सोलापूर २, रत्नागिरी ५ आणि औरंगाबाद येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये ७५ पुरुष तर ६४ महिलांचा समावेश आहे. ११० जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.आजपर्यंत कोरोना चाचणीचे ५ लाख २२ हजार ९४६ नमुने तपासले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक घरगुती अलगीकरणात आहेत.सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईतराज्यात मुंबईत सर्वाधिक ५ हजार ७६८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ठाण्यात ७ हजार १४०, पुण्यात ३ हजार ७६८ आणि पालघरमध्ये ७८० सक्रिय रुग्ण आहेत. याखेरीज, राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण सक्रिय आहे, तर वर्ध्यात २, चंद्र्रपूर ५ आणि नंदूरबारमध्ये ८ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५० कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या ४६ हजार ८० झाली आहे. तर दिवसभरात ५३ बळी गेले असून कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ५१९ जणांना जीवास मुकावे लागले. मुंबईत अजूनही २५ हजार ५३९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्के असून मृत्यू दर ३.३ टक्के आहे. याशिवाय, १५ मे रोजी शहराच्या रुग्णाच्या दुप्पट वाढीचा दर १२ दिवस होता, तो आता २० दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस