शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

राज्यात कोरोनाचे ८० हजार २२९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:26 IST

दिवसभरात वाढले २,४३६ रुग्ण, तर मृतांचा आकडा १३९वर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ हजार ४३६ रुग्णांची नोंदहोऊन बाधीत रुग्णांची एकूण संख्या ८० हजार २२९ एवढी झाली आहे. १३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २ हजार ८४९ झाला आहे.

शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार१५६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.८१ टक्के झाले असून मृत्यूदर सातत्याने कमी होत३.५५ टक्क्यांवर आला आहे. दिवसभरातील १३९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५४, ठाणे ३०, वसई-विरार १, कल्याण-डोंबिवली ७, भिवंडी १, जळगाव १४, नाशिक २, मालेगाव ८, पुणे १४, सोलापूर २, रत्नागिरी ५ आणि औरंगाबाद येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये ७५ पुरुष तर ६४ महिलांचा समावेश आहे. ११० जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.आजपर्यंत कोरोना चाचणीचे ५ लाख २२ हजार ९४६ नमुने तपासले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक घरगुती अलगीकरणात आहेत.सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईतराज्यात मुंबईत सर्वाधिक ५ हजार ७६८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ठाण्यात ७ हजार १४०, पुण्यात ३ हजार ७६८ आणि पालघरमध्ये ७८० सक्रिय रुग्ण आहेत. याखेरीज, राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण सक्रिय आहे, तर वर्ध्यात २, चंद्र्रपूर ५ आणि नंदूरबारमध्ये ८ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५० कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या ४६ हजार ८० झाली आहे. तर दिवसभरात ५३ बळी गेले असून कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ५१९ जणांना जीवास मुकावे लागले. मुंबईत अजूनही २५ हजार ५३९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्के असून मृत्यू दर ३.३ टक्के आहे. याशिवाय, १५ मे रोजी शहराच्या रुग्णाच्या दुप्पट वाढीचा दर १२ दिवस होता, तो आता २० दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस