शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:03 IST

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत

मुंबई : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज 7 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास हा आकडा 91 नं खाली आला आहे. मात्र राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील 454 शेतकऱ्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्य सरकारनं गेल्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास 38 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुन्या कर्जाची परतफेड न केल्यानं बँका शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस