शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:03 IST

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत

मुंबई : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज 7 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास हा आकडा 91 नं खाली आला आहे. मात्र राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील 454 शेतकऱ्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्य सरकारनं गेल्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास 38 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुन्या कर्जाची परतफेड न केल्यानं बँका शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस