शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:53 AM

राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे.

पुणे : राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे. त्यावरच पिण्यासाठी, शेती व उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे. मराठवाड्यात तर केवळ २३.७५ टक्के साठा असल्याने आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यातील ३ हजार २६६ लहानमोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४०हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि कोकण विभागात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता.>राज्यातील प्रमुख धरणांची स्थितीधरण उपयुक्त साठा जलसाठ्याची गेल्यावर्षीची(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी टक्केवारीतिल्लारी-सिंधुदूर्ग ३८६ ८६.२१ ९५.३२गोसीखुर्द-भंडारा ३७५ ५०.६६ २०.३८तातलाडोह-नागपूर १५० १४.७५ ३३.९७निम्न वर्धा ५७ २६.२८ ५८.८२भंडारदरा-अहमदनगर २४९ ८१.८३ १००मुळा-अहमदनगर ४१५ ६८.२२ १००गिरणा-नाशिक २४६ ४६.९४ ७१.७७दूधगंगा-कोल्हापूर ६४० ९४.२४ १००राधानगरी-कोल्हापूर २०५ ९३.१८ ९४.४२डिंभे-पुणे ३२२ ९१ १००पवना-पुणे २१७ ७९ ८७.८९पानशेत २८५ ९४.५४ १००भाटघर ६५७ ९८.७७ १००वरसगाव ३५९ ९८.९७ १००कोयना २४२० ८५.३६ ९९.१६उजनी १३८३ ९१.१८ १००

टॅग्स :Damधरण