पुणे : राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. सर्वाधिक १६४ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसामुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. चारही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता संभाजीनगर विभागात १३९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा १०४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात पाऊस चार टक्के अधिक झाला आहे. जूनमध्ये २०७ मिलिमीटर (९९.८ टक्के), जुलै २९०.८ मिलिमीटर (८७.९ टक्के), ऑगस्टमध्ये २९८.२ मिलिमीटर (१०४.३ टक्के), तर सप्टेंबरमध्ये २९५.३ मिलिमीटर (१६४.३ टक्के) पावसाची नोंद झाली.सप्टेंबरमध्ये सरासरी १८० मिलिमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात यंदा २९५ मिलिमीटर अर्थात १६४.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्याचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे.
बीड, धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्केजिल्हानिहाय विचार करता बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्के पाऊस पडला आहे. तर सर्वांत कमी ७१ टक्के पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra received 108% of average rainfall this monsoon, with September seeing a significant 164% increase. Sambhajinagar division recorded the highest rainfall at 139%. Beed and Dharashiv districts saw 161% rainfall, while Kolhapur experienced the least at 71%. Excess rain damaged crops.
Web Summary : महाराष्ट्र में इस मानसून में औसत से 108% बारिश हुई, सितंबर में 164% की वृद्धि हुई। संभाजीनगर विभाग में सबसे अधिक 139% बारिश दर्ज की गई। बीड और धाराशिव जिलों में 161% बारिश हुई, जबकि कोल्हापुर में सबसे कम 71% बारिश हुई। अत्यधिक बारिश से फसलों को नुकसान हुआ।