शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:24 IST

सांगली आणि काेल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये तब्बल 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे : सांगली व कोल्हापूरमधील महापुर तसेच इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात एकुण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्राम्हनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक व्यक्ती सुखरुप असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण १७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारपर्यंत सहा जण बेपत्ता होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकुण मृतांमध्ये १२ महिला व चार लहान मुलांचा समावेश आहे. आमसिध्द नरूरे हे सुखरुप असल्याचे स्थानिक भागात चौकशी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मृतांचा एकुण आकडा १९ वर पोहचला आहे. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. कोल्हापुर जिल्ह्यामध्ये ६ आणि सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सोलापुरमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील मृतांचा एकुण आकडा ४० वर गेला असून तीन जण बेपत्ता आहेत.

कोल्हापुर जिल्ह्यातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार २२९ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी १८८ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. सांगलीमधील १ लाख ५८ हजार ९७० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठीस ११७ ठिकाणी निवारा करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील १० हजार ४८६ तर सोलापूर जिल्ह्यातील २७ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पुणे विभागातील स्थलांतरीतांची संख्या तब्बल ४ लाख ४१ हजार ८४५ एवढी आहे.

ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची नावे (कंसात वय) गंगुबाई भिमा सलगर (६०), बाबूराव आण्णा पाटील (६५), वर्षा भाऊसो पाटील (४०), लक्ष्मी जयपाल वडेर (६५), कस्तुरी जयपाल वडेर (३५), राजमती जयपाल चौगुले (वय ६२), कल्पना रविंद्र कारंडे (३५), सुवर्णा उर्फ नंदा तानाजी गडदे (वय ३५), राजवीर आप्पासो घटनटटी (४ महिने), सोनाली आप्पासो घटनटटी (४), सुरेखा मधुकर नरूटे (४५), रेखा शंकर वावरे (४०), सौरव तानाजी गडदे (८), सुनिता संजय रोगे, कोमल मधुकर नरूटे (२१), मनिषा दिपक पाटील (३१), क्षिती दिपक पाटील (४).

 

 

टॅग्स :Deathमृत्यूKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरRainपाऊस