शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:24 IST

सांगली आणि काेल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये तब्बल 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे : सांगली व कोल्हापूरमधील महापुर तसेच इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात एकुण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्राम्हनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक व्यक्ती सुखरुप असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण १७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारपर्यंत सहा जण बेपत्ता होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकुण मृतांमध्ये १२ महिला व चार लहान मुलांचा समावेश आहे. आमसिध्द नरूरे हे सुखरुप असल्याचे स्थानिक भागात चौकशी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मृतांचा एकुण आकडा १९ वर पोहचला आहे. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. कोल्हापुर जिल्ह्यामध्ये ६ आणि सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सोलापुरमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील मृतांचा एकुण आकडा ४० वर गेला असून तीन जण बेपत्ता आहेत.

कोल्हापुर जिल्ह्यातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार २२९ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी १८८ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. सांगलीमधील १ लाख ५८ हजार ९७० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठीस ११७ ठिकाणी निवारा करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील १० हजार ४८६ तर सोलापूर जिल्ह्यातील २७ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पुणे विभागातील स्थलांतरीतांची संख्या तब्बल ४ लाख ४१ हजार ८४५ एवढी आहे.

ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची नावे (कंसात वय) गंगुबाई भिमा सलगर (६०), बाबूराव आण्णा पाटील (६५), वर्षा भाऊसो पाटील (४०), लक्ष्मी जयपाल वडेर (६५), कस्तुरी जयपाल वडेर (३५), राजमती जयपाल चौगुले (वय ६२), कल्पना रविंद्र कारंडे (३५), सुवर्णा उर्फ नंदा तानाजी गडदे (वय ३५), राजवीर आप्पासो घटनटटी (४ महिने), सोनाली आप्पासो घटनटटी (४), सुरेखा मधुकर नरूटे (४५), रेखा शंकर वावरे (४०), सौरव तानाजी गडदे (८), सुनिता संजय रोगे, कोमल मधुकर नरूटे (२१), मनिषा दिपक पाटील (३१), क्षिती दिपक पाटील (४).

 

 

टॅग्स :Deathमृत्यूKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरRainपाऊस